महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश*_*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद !*
दिनांक : २०.०४.२०२६ _*महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश*_ *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद !* *सिंधुदुर्गनगरी -* दशकानुदशकांचे अंतर्गत मतभेद, मानकऱ्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये 'महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हास्तरीय मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे घारपीचे बंद मंदिर उघडले, माडखोलमधील विखुरलेले मानकरी एकत्र आले तर पडवे, ओसरगाव आणि उगाडे येथील देवस्थानांनी सुव्यवस्थापन व धर्मरक्षणाची कास धरली आहे. आध्यात्मिक हानी रोखण्यासाठी महासंघाने उभारलेली ही संघटनशक्ती जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे श्री. शरद राऊळ, श्री. ...