वने म्हणजेच जीवनाचा श्वास” : जागतिक वन दिनी राज्यभर हरित संदेश*
*“वने म्हणजेच जीवनाचा श्वास” : जागतिक वन दिनी राज्यभर हरित संदेश* *जंगल हे अन्न, पाणी, हवा आणि संस्कृती जपते - घैसास* *ग्रामीण भागात वृक्षसंवर्धनाची चळवळ; सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम;* पुणे प्रतिनिधी - जागतिक वन दिनानिमित्त “वने ही मानवी जीवनाचा श्वास आहेत” हा संदेश देत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागांत व्यापक वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास, स्मिता घैसास तसेच कार्याध्यक्षा शलाका घैसास यांनी याबाबत माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगताना त्यांनी वाढत्या प्रदूषणामुळे आणि वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. “प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तरच भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा मिळेल,” असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाअंतर्गत पुणे, म्हसवाड, बीड, विंचुरवाडा, गडचिरोली आणि नंदुरबार या भागांमध्ये लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करून, वृक्षारोपण, पर्यावरण आणि जंगलांचे रक्षण कसे करायचे याची मोहीम राबविण...