गोड साखर कडू झाली – इथेनॉलच्या धोरणाने साखर आयात करण्याची वेळ आली!* *साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेत डॉ. अभिजीत मोरे यांची टीका*
*गोड साखर कडू झाली – इथेनॉलच्या धोरणाने साखर आयात करण्याची वेळ आली!* *साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेत डॉ. अभिजीत मोरे यांची टीका* सणांच्या पार्श्वभूमीवर देशभर साखरेचा भाव आभाळाला भिडला, तर सामान्य माणसाच्या ताटातली गोडी हरवली. याच विषयावर आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे यांनी काल सायंकाळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालयात आयोजित ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाले’च्या ४३४ व्या पुष्पात अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. हा कार्यक्रम दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. व्याख्यानाचे अध्यक्षस्थान मा. दादासाहेब सोनवणे यांनी भूषवले. डॉ. मोरे यांनी असे म्हटले की, "गेल्या जुलैमध्ये जी साखर ४८ रुपयांना मिळत होती, ती आज ७५ रुपयांना पोहोचली. सध्या किंमती काहीशा खाली आल्या आहेत, पण गणेशोत्सव, दसरा, दिवाळी – या सणांच्या आधी पुन्हा भाव उसळल्यास नवल नाही. या वाढत्या किमतींनी गोड सणही कडू करून सोडले आहेत." भारत जगात साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण तरीही केंद्र सरकारला साखरेची देशांतर्गत गरज भागवण्यास...