Posts

फिनिक्स हॉस्पिटलतर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर; शेकडो वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ*

Image
*फिनिक्स हॉस्पिटलतर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर; शेकडो वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ* आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची, भक्तीची आणि सेवेची परंपरा जपणारी पवित्र वारी आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून राजवीर हेल्थ सर्व्हिसेस प्रा. लि. अंतर्गत फिनिक्स हॉस्पिटल यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये वारकऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच प्राथमिक उपचार आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सलग पायी प्रवासामुळे येणारा थकवा, निर्जलीकरण, सांधेदुखी, ताप, सर्दी, पायांचे विकार यांसारख्या सामान्य आरोग्य समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. शेकडो वारकऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत फिनिक्स हॉस्पिटलच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. २०११ पासून फिनिक्स हॉ...

२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड

Image
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड पुणे, महाराष्ट्र | १० जुलै २०२६: महाराष्ट्र आणि भारतीय हॉकीसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, 'हॉकी इंडिया'ने जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games 2026) २० सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली असून, त्यात महाराष्ट्राच्या ऋतुजा दादासाहेब पिसाळची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोल्की गावची रहिवासी असलेली ऋतुजा देशातील सर्वात आश्वासक युवा 'फॉरवर्ड' खेळाडूंपैकी एक म्हणून उदयास आली आहे. तिची ही निवड म्हणजे तिची अनेक वर्षांची कठोर मेहनत, शिस्त आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ आहे. ऋतुजाने अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात 'महिला ज्युनियर आशिया कप २०२३' (जिथे भारताने विजेतेपद पटकावले) आणि 'एफआयएच (FIH) हॉकी-५ एस विश्वचषक २०२४' (जिथे भारतीय संघाने रौप्यपदक जिंकले) यांचा समावेश आहे. तिचा वेग, आक्रमक खेळण्याची वृत्ती आणि मैदानावर दाखवलेली जिद्द यामु...

वारकऱ्यांच्या सेवेत Esvee Team ची विठ्ठलभक्ती” — विजय वाघमारे व शिल्पा जयमनी यांच्या नेतृत्वाखाली अनोखा सेवायज्ञ

Image
“वारकऱ्यांच्या सेवेत Esvee Team ची विठ्ठलभक्ती” — विजय वाघमारे व शिल्पा जयमनी यांच्या नेतृत्वाखाली अनोखा सेवायज्ञ पुणे : आषाढी वारी ही केवळ परंपरा नसून भक्ती, समर्पण आणि माणुसकीचा उत्सव आहे. याच सेवाभावातून Esvee Hair Studio & Academy चे संस्थापक विजय वाघमारे व शिल्पा जयमनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण Esvee Team ने वारकरी बांधवांसाठी हृदयस्पर्शी सेवा उपक्रम राबविला. एरंडवणे येथील श्रीमती अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल येथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम माऊली यांच्या दिंडींचा मुक्काम असताना, तेथे आलेल्या हजारो वारकऱ्यांसाठी मोफत हेअर कट, दाढी सेवा, फूट मसाज तसेच यंदा प्रथमच फुल बॉडी मसाज या विशेष सेवेचे आयोजन करण्यात आले. अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांचे थकलेले पाय, श्रमाने दमलेले शरीर आणि चेहऱ्यावरचा थकवा दूर करण्यासाठी Esvee Team चे सदस्य दिवसभर सेवेत तत्पर होते. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटलेले समाधानाचे हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे भाव हेच या सेवाकार्यातील सर्वात मोठे यश ठरले. विजय वाघमारे आणि शिल्पा जयमनी हे गेल्या अनेक वर्षांपासू...

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी १६ मोफत सेवांचा शुभारंभ; माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते उद्घाटनकष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला.

Image
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी १६ मोफत सेवांचा शुभारंभ; माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुणे (१० जुलै २०२६) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच संत रोहिदास महाराज दिंडीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बाबा सामाजिक फाउंडेशन आणि सहयोगी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत १६ विविध मोफत सेवांचे उद्घाटन आज माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक १० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दारूवाला पूल येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे (माऊली) यांनी भूषविले. या उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ. बाबा कांबळे (माऊली) म्हणाले की, आमचे कार्यकर्ते अत्यंत समर्पित भावनेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सध्या ही सेवा पिंपर...

पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित शहा यांच्यातर्फे राजगिरी लाडू वाटप

Image
पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित शहा यांच्यातर्फे राजगिरी लाडू वाटप  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांना वडगाव शेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित मोहनभाई शहा यांच्या हस्ते सुमारे 2000 पाकीट राजगिरी लाडू आणि गुडदाणी वाटप करण्यात आले होते. यावेळी  ॲड.विक्रम दौंडकर, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षद जाधव, परेश कटारिया, सुजल शहा, सुरज शहा, राखी शहा, श्रीमती शोभा शहा, राहुल दौंडकर, आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जहाजातून उडी घेऊन फ्रान्स चा किनारा गाठला या स्मरणार्थ "श्री स्वामी समर्थ मंडळा"तर्फे मोतीबाग येथे सागरा प्राण तळमळला नाटय अभिवाचन

Image
८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जहाजातून उडी घेऊन फ्रान्स चा किनारा गाठला या स्मरणार्थ "श्री स्वामी समर्थ मंडळा"तर्फे मोतीबाग येथे सागरा प्राण तळमळला नाटय अभिवाचन पुणे ( प्रतिनिधी) दिनांक ८ जुलै १९१० स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जहाजातून उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला त्याचे स्मरण म्हणून ८ जुलै २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंडळाने मधुसूदन कालेलकर लिखित "सागरा प्राण तळमळला" नाटकाचे अभिवाचन कार्यक्रम भारतीय संस्कृती संवर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात शुभारंभाचा प्रयोग केला.अभिवाचन सुधीर मोघे,अनुपमा कुलकर्णी,प्रियांका अभ्यंकर ,प्रदीप बर्गे,प्रदीप रत्नपारखी,राजीव कुलकर्णी,लक्ष्मण दाते,संदीप नगरकर,निलेश दातार या कलाकारांनी सादर केले.याची संकल्पना डॉ शिरीष ठाकूर यांची होती तर सूत्र संचलन प्रियांका अभ्यंकर यांनी केले.दिग्दर्शन अनुपमा कुलकर्णी यांनी केले.संगीत संयोजन अनुपमा कुलकर्णी,प्रसाद घोटवडेकर,ध्वनी हरीश ढोकळे आणि चित्रीकरण सहाय्य हर्ष...

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

Image
आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न पुणे, १० जुलै २०२६ : आषाढी वारीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “भव्य कलाकार दिंडी” आज पुण्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. “संतांच्या चरणी… कलेच्या संगतीने!” या संकल्पनेवर आधारित या दिंडीत चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच विविध कला क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या भव्य कलाकार दिंडीतून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त वारी, जलसंधारण तसेच सामाजिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी यांसारखे महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आले. कलाकारांनी आपल्या सहभागातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभो...