Posts

एअर इंडिया एक्सप्रेसकडून मर्यादित आवृत्तीतील राख्यांसह विमानात रक्षाबंधनाचा उत्सव

Image
    एअर इंडिया एक्सप्रेसकडून मर्यादित आवृत्तीतील राख्यांसह विमानात रक्षाबंधनाचा उत्सव   २७ आणि २८ ऑगस्ट रोजी एअरलाइनच्या नेटवर्कमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष स्वरूपात तयार केलेल्या रक्षाबंधनाच्या आठवणीस्वरूप भेटवस्तू मिळणार   २७ ऑगस्ट २०२५, राष्ट्रीय: यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवरील विशेष विमानातील उत्सवाच्या माध्यमातून सणाचा आनंद आकाशात पोहोचवण्याची तयारी केली आहे. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी एअरलाइनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केबिन क्रूच्या हस्ते मर्यादित आवृत्तीतील राख्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे नेहमीचा प्रवासही आपुलकीच्या आणि भावनिक उत्सवी क्षणात रूपांतरित होणार आहे.   या उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष आहे. एअर इंडिया एक्सप्रेस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवरील प्रवाशांसोबत मर्यादित आवृत्तीतील राख्या शेअर करून रक्षाबंधन साजरे करणार आहे. याद्वारे प्रवाशांपर्यंत स्नेह, आपुलकी आणि जोडणीचा या सणाचा संदेश पोहोचवला जाणार आहे.   हा उपक्रम लोक, ठिकाणे आणि संस्कृती यांच्यात अर्थप...

चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांचे विजय

Image
   चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांचे विजय  पुणे, 27 ऑगस्ट 2026: सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवले यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.  प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित आहाना गोडबोले याने तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा 11-5,12-10,6-11,11-7 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित दिया शिंदेने डायना पटेलचा 11-6,11-6,11-6 असा तर चौथ्या मानांकित अनन्या पाटीलने पाचव्या मानांकित स्पृहा गुजरचा 11-3,11-5,8-11,9-11,11-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.  15 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित तनय इंगवले याने दुसऱ्या मानांकित पुष्कर चक्रदेवचा 11-7,11-5,10-12,11-8 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल माना...

लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार उल्हास पवार यांना जाहीरपुणे परिवारच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान

Image
लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार उल्हास पवार यांना जाहीर पुणे परिवारच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान पुणे : पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सदाशिव पेठेतील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये होणार आहे. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे परिवारचे अॅड. प्रताप परदेशी, विनायक घाटे आणि शिरीष मोहिते यांनी दिली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यास कृषिमंत्री दत्ता भरणे, आमदार हेमंत रासने, विजयकुमार कुवळेकर, जन्मेजयराजे भोसले, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संजय दराडे, कृषिकेश रावले, सुनील रासने, अण्णा थोरात, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत. आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कारासाठी नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष परेश हराळे, देशप्रेमी मित्र मंडळ, एरंडवणेचे कार्यकर्ते मंदार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी आयोजित “बेरोजगार हक्क एल्गार” तिरंगा टू-व्हीलर रॅलीला पुण्यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी आयोजित “बेरोजगार हक्क एल्गार” तिरंगा टू-व्हीलर रॅली पुणे शहरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे,शहराध्यक्ष विशाल तांबे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील व गटनेते काका चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.  महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने या ‘बेरोजगार हक्क एल्गार’ रॅली चे करण्यात आले होते. शिक्षण पूर्ण करून हातात पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा आहे. वर्षानुवर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना सरकारी नोकरीच्या संधी मिळण्याऐवजी भरती प्रक्रियेतील अनागोंदी, दिरंगाई आणि अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजचा हा एल्गार केवळ एका पक्षाचे आंदोलन नसून महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगार युवकाच्या भविष्याचा आणि त्याच्या हक्काचा आवाज आहे.आज राज्यात हजारो सरकारी पदे रिक्त असताना भरती प्रक्रिया मात्र संथ गतीने सुर...

कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर भारतात वाढवण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीज आणि झिनटेओ (Xynteo) यांचा हॅबिटॅट मॅटर्स हा उपक्रम

कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर भारतात वाढवण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीज आणि झिनटेओ (Xynteo) यांचा हॅबिटॅट मॅटर्स हा उपक्रम कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या नावीन्यपूर्ण साहित्याची ओळख पटवणे, त्यांची चाचणी घेणे आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध करणे या गोष्टी गोदरेज प्रॉपर्टीजचा (GPL) हा सीएसआर (CSR) उपक्रम करेल मुंबई 27 ऑगस्ट 2026: गोदरेज प्रॉपर्टीज (GPL) ने झायन्टिओ सोबत, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या गुड अँड ग्रीनची नावीन्यपूर्ण शाखा असलेल्या गोदरेज गुड अँड ग्रीन लॅब्स अंतर्गत हॅबिटॅट मॅटर्स सुरू करण्याची घोषणा आज केली. भारतातील बांधकाम क्षेत्रात कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर वाढवणे हा या सीएसआर उपक्रमाचा उद्देश आहे. जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत सध्या बांधकाम तेजीच्या सर्वात मोठ्या टप्प्यात आहे. 2050 पर्यंत, देशात 35 अब्ज चौरस फुटांपेक्षा जास्त नवीन बांधकाम क्षेत्र निर्माण होण्याची अपेक्षा आहे, जे आजच्या बांधकाम क्षेत्राच्या दुप्पटीहून अधिक आहे. या कालावधीत बांधली जाणारी प्रत्येक इमारत, बांधल्या क्षणीच आपला पर्यावरणीय ठसा निश्चित करते, ज...

अभिनवच्या एनएसएस विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधला कृतज्ञतेचा धागा

Image
*अभिनवच्या एनएसएस विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधला कृतज्ञतेचा धागा* पुणे : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून अभिनवच्या एनएसएसच्या विद्यार्थिनींनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बांधवांनीही विद्यार्थिनींच्या या प्रेमळ भावनेचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले. या उपक्रमातून ‘राखीचा धागा केवळ नात्याचा नसतो, तो विश्वास आणि कर्तव्याची जाणीवही दृढ करतो’ हा सुंदर संदेश विद्यार्थिनींनी दिला. सेक्रेटरी सुनीता जगताप म्हणाल्या "एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रसेवेची भावना, संवेदनशीलता आणि समाजाप्रती कृतज्ञतेची जाणीव निर्माण करण्याचा अभिनवचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. याच सामाजिक जाणिवेचा प्रत्यय या रक्षाबंधनाच्या आणि सायबर सुरक्षा या कार्यक्रमातून आला....

मानवी राखीतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
*मानवी राखीतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश*  जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग  पुणे : राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि प्रेम हे संपूर्ण जगभरात टिकून रहावे, यासाठी नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारली. तसेच आजुबाजुच्या परिसरातील पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दलातील सेवक, स्वच्छता कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना राख्या बांधून विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिका-यांनी रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरे केले.   जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मानवी राखी साकारण्यात आली होती. यावेळी विविधरंगी वेशात विद्यार्थ्यांनी राखीचे विविध प्रकार देखील उपस्थितांसमोर साकारले. यामध्ये तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, रक्षाबंधन हा बहिण आणि भावाचा सण. मात्र, आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजातील विविध घटकांसाठी झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दलातील सेवक, स्वच्छता कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर...