Posts

श्री महालक्ष्मी मंदिरात पुणेकरांनी रंगविल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती*'आपला बाप्पा आपणच रंगवा' हा अनोखा उपक्रम ; पर्यावरणपूरक मूर्तींना केले रंगकाम

Image
*श्री महालक्ष्मी मंदिरात पुणेकरांनी रंगविल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती* 'आपला बाप्पा आपणच रंगवा' हा अनोखा उपक्रम ; पर्यावरणपूरक मूर्तींना केले रंगकाम पुणे : पारंपरिक पद्धतीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला रंग देणे, कोरड्या रंगांचा वापर करणे आणि मूर्तीवरील वस्त्रावर सिल्क इफेक्ट करणे अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करीत पुणेकरांनी आपला लाडका गणपती बाप्पा आपणच रंगवला. गणेशोत्सवात ज्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करणार आहोत, त्या मूर्ती स्वतःच्या हाताने व कल्पकतेने रंगविण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग व तेजोमय कलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 'आपला बाप्पा आपणच रंगवा' या कार्यशाळेचे आयोजन महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त हेमंत अर्नाळकर, व्यवस्थापक ऋषिकेश मोरे, तेजोमय कलामंदिरचे आनंद भांबुरकर, सोनाली नेने, प्रेरणा कुलकर्णी यांसह पदाधिकारी उपस्थित होते. पांढऱ्या शुभ्र शा...

संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन*

Image
*संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन* पुणे :  भारतीय संविधान आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा अवमान करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात पुणे शहर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी कॉँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष कुणाल राजगुरू, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, संग्राम रोहम आदि मान्यवर उपस्थित होते. देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर असलेले वरिष्ठ संसदीय सभागृहाचे सदस्य व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८ ऑगस्ट २०२६ रोजी विजय शंखनाद रॅलीच्या कार्यक्रमासाठी उत्तराखंड मधील हलदानी येथील  रामलीला मैदानावर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जातीयवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी गोमूत्र शिंपडून मैदान पवित्र केल्याचा दावा केला आहे, ही कृती म्हणजे केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचाच नव्हे तर भारतीय संविध...

*प्रा. सुभाष जगताप यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी : प्रा. मिलिंद जोशी

Image
*प्रा. सुभाष जगताप यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी : प्रा. मिलिंद जोशी*   *‘परिस स्पर्श’ स्मरणिकेचे दिमाखदार प्रकाशन; प्रा. सुभाष जगताप यांच्या कार्याचा गौरव*  पुणे : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीहिताच्या कार्याचा गौरव करणाऱ्या ‘परिस स्पर्श’ या स्मरणिकेचे प्रकाशन पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे उत्साहात पार पडला. फ्रेंड्स अकॅडमी माजी विद्यार्थी समिती, सासवड आणि इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘सकाळ’चे माजी संपादक मल्हार अरणकल्ले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना शिक्षक आणि प्राध्यापकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित राहता कामा नये, असे मत व्यक्त...

अभिनवमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकोणताही प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य - राजीव जगताप

Image
अभिनवमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा कोणताही प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य                       - राजीव जगताप आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे आपले मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि ते सर्वांनी जपले पाहिजे असे प्रतिपादन संस्थापक राजीव जगताप यांनी केले. आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभात केले ,यावेळी प्रमुख पाहुणे ओमकार वाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी संस्थापक राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप, सह सेक्रेटरी निर्मोही जगताप दीपिका जगताप ॲड.दिलीप जगताप,समन्वयक डॉ. सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा,मुख्याध्यापिका मनीषा शिंदे,संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य,पर्यवेक्षिका,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                   कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पा...

अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

Image
*अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या नर्हे कॅम्पसमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधवराव सानप (निवृत्त आयजीपी) उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजीव जगताप , उपाध्यक्ष संजीव जगताप , सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप,खजिनदार ध्रुव जगताप, सदस्य आणि समन्वयक डॉ. सविता शिंदे , माजी उपसभापती प्रभावती भुमकर ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पवार, समाजसेवक जोगदंड सर यांची विशेष उपस्थिती होती. अभिनव च्या नऱ्हे कॅम्पसमधील सर्व महाविद्यालये व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीताच्या सन्मानाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्र...

मेरीटॉन टॉवर" सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.**सोसायटीतील नूतन कमिटीच्या पहिल्याच देशभक्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले "मेरीटॉन" कुटुंब.*

Image
*"मेरीटॉन टॉवर" सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.* *सोसायटीतील नूतन कमिटीच्या पहिल्याच देशभक्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले "मेरीटॉन" कुटुंब.* आंबेगाव पठार येथील "मेरीटॉन"सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक आप्पा रेणुसे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी, सामाजिक कार्यकर्ते विराज रेणुसे, विलास भणगे सोसायटीचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर झेंडावंदन करून करण्यात आली.आप्पा रेणुसे म्हणाले की,"भारतामध्ये एकत्रीकरणाची गरज व्यक्त करून प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपला पाहिजे ,त्याचबरोबर माणसाने माणसासारखे वागून देशाप्रती ऋण व्यक्त केले पाहिजे. असे प्रतिपादन केले,यावेळी देशभक्तीपर कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम सोसायटीमध्ये नेहमी साजरे करण्यासाठी आवाहन केले.स्वातंत्र्य दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीचे सर्व वॉचमन, आणि सफाई कामगारांचा प्रमुख पाहुण्यांच्य...

मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे.

Image
  मालमत्ता नोंदणी सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जागतिक दर्जाचा सेवा अनुभव        मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे. मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता आणून परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील पहिले "आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय " पुण्यात स्थापन झाले आहे.   जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम नागरिक सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित, अत्याधुनिक केंद्र. सर्व केंद्रांवर कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी संपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा आणि आधुनिक सेवा वितरण प्रणाली. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नागपूर येथे आणखी ४ ' आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये' (Model Sub-Registrar Offices) सुरू केली जाणार आहेत.   मालमत्ता नोंदणी सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जागतिक दर्जाचा सेवा अनुभव उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, विश्वसनीय तंत्रज्ञान सेवांमधील जागतिक अग्रणी संस्था ‘व्हीएफएस ग्लोबल सर्व्...