Posts

ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्तीनियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान

Image
ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती नियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान पुणे, : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून, या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोपर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यातील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी, रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. नियुक्तीपत्रात ख्रिस्तोपर राजमनी यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांशी निष्ठावंत राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे, तसेच पीडित, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पक्षामध्य...

सावित्रीबाईंच्या कवितेत समाजक्रांतीचा विचार : प्रा मिलिंद जोशी‘चपराक’तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे लोकार्पण

Image
सावित्रीबाईंच्या कवितेत समाजक्रांतीचा विचार : प्रा मिलिंद जोशी ‘चपराक’तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे लोकार्पण   पुणे : जातीधर्मभेद न मानणारा, समतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून मांडला. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी समाजक्रांतीचा विचार आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ही ‘काव्यफुले’ ‘क्रांतीफुले’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ही क्रांतीफुले तुमच्या मनामध्ये विचारांच्या ठिणग्या निर्माण करतील, असेही ते म्हणाले.   चपराक प्रकाशनाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भरत नाट्य मंदिर येथे गुरुवारी (दि. ४) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी, काकडे शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, कार्यक्रमाचे निमंत्रक घनश्याम पाटील, ज्ञानेश्र्वर तापकीर, चंद्रलेखा बेलसरे, शुभांगी गिरमे मंचावर होते.   सध्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची स...

IndiGo temporarily suspends operations to six international destinations as part of network optimization; Retains 1,800+ weekly international flights despite adjustments

IndiGo temporarily suspends operations to six international destinations as part of network optimization; Retains 1,800+ weekly international flights despite adjustments   National, 04 June 2026: In view of a traditionally softer demand in the upcoming quarter and an incredibly challenging cost environment, IndiGo has decided to make temporary adjustments to a limited segment of its international network including temporary suspension of operations to Langkawi, Krabi, Ho Chi Minh, Hong Kong and Shanghai starting 1 July 2026, and Siem Reap effective 3 July 2026, until 30 September 2026. IndiGo will resume bookings for all the impacted services starting 1 October 2026; however, should the environment become favourable, IndiGo stands prepared to reinstate these services earlier than scheduled, in appropriate lead time.   Notably, the airline has managed to retain majority of its international operations, i.e. over 1,800 weekly international flights, despite this realignment. Thes...

वोडाफोन आयडिया आणि मेटा यांची भागीदारी; मेटा प्लॅटफॉर्म्सवर वी युजर्सचे वेरिफिकेशन होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान

वोडाफोन आयडिया आणि मेटा यांची भागीदारी; मेटा प्लॅटफॉर्म्सवर वी युजर्सचे वेरिफिकेशन होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान   सादर आहे 'सायलेंट मोबाईल वेरिफिकेशन': हे नेटवर्कवर आधारित एक ऑथेंटिकेशन सोल्यूशन आहे. युजर रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर वेरिफिकेशन, लॉगिन-रीलॉगिन, अकाऊंट रिकव्हरी आणि सिक्युरिटी चेक दरम्यान हे सोल्यूशन युजर्सची ओळख अगदी सुरक्षितपणे पटवते. या सोल्यूशनचे फायदे: यामुळे ऑनबोर्डिंग प्रक्रिया वेगवान होते, मॅन्युअल स्टेप्स कमी होतात आणि फिशिंग व डिजिटल आयडेंटिटीच्या धोक्यांपासून अधिक मजबूत सुरक्षा मिळते.   भारतातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी, वोडाफोन आयडिया (वी) ने मेटा प्लॅटफॉर्म्सच्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वी युजर्ससाठी 'सायलेंट मोबाईल व्हेरिफिकेशन' क्षमता सुरू केल्याची घोषणा आज केली आहे; ज्यामुळे लाखो युजर्सना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि पासवर्ड-मुक्त डिजिटल अनुभव मिळणार आहे.   'सायलेंट मोबाईल वेरिफिकेशन' हे नेटवर्कवर चालणारे एक सुरक्षित तंत्रज्ञान आहे. यामध्ये युजरला स्वतः कोणताही पासवर्ड किंवा ओटीपी टाकावा लागत नाही, दुसरे कोणते ॲप उघडावे लागत ...

पुण्यात आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण ; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग

Image
पुण्यात आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण ; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग पुणे 5 जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२६ रोजी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम आणि आनंदवन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज ५ (औतडवाडी हांडेवाडी) आणि न्याती काउंटी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेत निसर्गप्रेमींनी आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.         या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर श्री. आशिष ठाकरे यांनी सांगितले की, "झपाट्याने होणारे शहरीकरण आणि जागतिक तापमान वाढ या संकटांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. लोक सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे.”         सध्या जगभरात भेडसावणारी जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग), सातत्याने वाढणारा उन्हाचा कडाका आणि दुर्मि...

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकमुळे वार्षिक इंधन खर्चात ~₹272 कोटींची बचत होण्याचा अंदाज: इंटैंगल्सचा अहवाल

Image
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकमुळे वार्षिक इंधन खर्चात ~₹272 कोटींची बचत होण्याचा अंदाज: इंटैंगल्सचा अहवाल महामार्गाच्या वाहतुकीत दरवर्षी 2.7 कोटी लिटर इंधन बचतीचा अंदाज ट्रकच्या सरासरी वेगात 18% वाढ नोंदवली गेली, तसेच तीन-ॲक्सल वाहनांनी हा मार्ग 20% कमी वेळेत पूर्ण केला कमी इंधन वापरामुळे दरवर्षी 64,905 मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन टाळता येते   पुणे, 5 जून 2026: व्यावसायिक वाहन क्षेत्रात तज्ञ असलेली जागतिक एआय-संचालित प्रेडिक्टिव्ह इंटेलिजन्स कंपनी इंटैंगल्सने कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील व्यावसायिक वाहनांच्या कामगिरीचे विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. या विश्लेषणानुसार, महामार्गावरील सुधारित वाहतूक प्रवाहामुळे दरवर्षी 2.7 कोटी लिटरपर्यंत संभाव्य इंधन बचत होऊ शकते, जी महामार्गावरील वाहतुकीसाठी अंदाजे ₹272 कोटींच्या वार्षिक इंधन खर्च कपातीच्या समतुल्य आहे. अंदाजित इंधन बचतीमुळे दरवर्षी 64,905 मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन टाळण्यासही मदत होऊ शकते. एकत्रितपणे, हे निष्कर्ष मुंबई-पुणे-बेंगळुरू मार्ग आणि महाराष्ट्राच्या मालवाहतूक व प्रवासी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या...

एमआयटी एडीटी विद्यापीठात 'एक पेड़ माँ के नाम' मोहिम* *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन*

Image
*एमआयटी एडीटी विद्यापीठात 'एक पेड़ माँ के नाम' मोहिम*  *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन* पुणे, ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलपती व कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांच्या प्रेरणेने तसेच कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत मॅनेटच्या ३०० कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कांचन, बहावा, गुलमोहर आणि पाम (ताड) यांसह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड विद्यापीठ परिसरात करण्यात आली. या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. डॉ. सूराज भोयर, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, परीक्षा...