Posts

हिंदुजा फाउंडेशनच्या 'जल जीवन' उपक्रमाचा महाराष्ट्रातील 1.5 लाख लोकांना फायदा; दरवर्षी 690 दशलक्ष लिटर पाण्याची बचत

Image
हिंदुजा फाउंडेशनच्या 'जल जीवन' उपक्रमाचा महाराष्ट्रातील 1.5 लाख लोकांना फायदा; दरवर्षी 690 दशलक्ष लिटर पाण्याची बचत पाणलोट क्षेत्र विकास, नदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संधारणाद्वारे सुमारे 690 दशलक्ष लिटर वार्षिक जलसंवर्धनाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे.   मुंबई, 20 मार्च 2026: जागतिक जल दिनाच्या निमित्ताने, हिंदुजा समूहाची सामाजिक उपक्रम राबवणारी शाखा असलेल्या 'हिंदुजा फाउंडेशन'ने आपल्या 'जल जीवन' या प्रमुख जल-व्यवस्थापन कार्यक्रमाचा किती लोकांना फायदा झाला, त्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, भूजल पुनर्भरण, नदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन यांसारखे प्रकल्प राबवून, 1.5 लाखांहून अधिक लोकांना लाभ पोहोचवण्यात आला आहे.   चेक डॅम्स, पुनर्भरण संरचना, जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन प्रणाली अशा एकत्रित उपक्रमांद्वारे, या फाउंडेशनने दरवर्षी सुमारे 69 कोटी लिटर पाण्याची बचत साध्य केली आहे. या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील 1,020 एकरांहून अधिक शेतजमिनीसाठी सिंचन व्यवस्था भक्कम झ...

महिला दिनानिमित्त “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
महिला दिनानिमित्त “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशन यांच्या तर्फे “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सौ. राधिका जहागिरदार, डॉ. अपर्णा देशमुख आणि सौ. अनिता देवकर यांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी डॉ. दुधभाते नेत्रालयाचे सर्वेसर्वा डॉ. अनिल दुधभाते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस सहायक आयुक्त रुक्मिणीताई गलांडे होत्या. तसेच महानगरपालिका नगरसेविका ज्योतीताई गोसावी, धनश्रीताई कोल्हे, विखे वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. राम पडळकर, दत्ताभाऊ कोल्हे, आसावरी चव्हाण, साहित्यिक गिरीश वसेकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, शितल हिरळकर, गौरी निमकर, कोमल भोसले व अनुराग क्षीरसागर यांच्यासह डॉ. दुधभाते नेत्रालयाचा संपूर्ण कर्मचारी...

नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग तयार व्हावा : शर्वरी जमेनीस गानवर्धन आयोजित कथक नृत्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा

Image
नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग तयार व्हावा : शर्वरी जमेनीस   गानवर्धन आयोजित कथक नृत्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा   पुणे : वर्षानुवर्षे गायन तसेच वादनकलेचा आस्वाद घेत असल्याने, या कलांचा आस्वादक रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार झाला आहे. तसाच नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार व्हावा. रसिकांची दाद, त्यांचा आस्वाद यातून नृत्यकलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि नृत्यकलाही समृद्ध होईल, अशी अपेक्षा प्रसिद्ध कथक नृत्यांगना, अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.   हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात गेली ४८ वर्षे कार्यरत असलेली गानवर्धन संस्था आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कथक नृत्य स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलकारांना पारितोषिक वितरण आणि त्यांचा नृत्याविष्कार आज (दि. २१) आयोजित करण्यात आला होता. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई, तसेच पराग गाडगीळ यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. पराग गाडगीळ, भाग्यश्री देसाई, शर्वरी जमेनीस य...

अनटोल्ड मार्चेस..’मधून लष्करी जीवनाचे वास्तव दर्शन : सुमित मलिककर्नल नंदकिशोर कुलकर्णी लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज्‌ बिट्‌विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन

Image
‘अनटोल्ड मार्चेस..’मधून लष्करी जीवनाचे वास्तव दर्शन : सुमित मलिक कर्नल नंदकिशोर कुलकर्णी लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज्‌ बिट्‌विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे : कर्नल नंदकिशोर कुलकर्णी (सेवानिवृत्त) लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज्‌ बिट्‌विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ हे पुस्तक म्हणजे केवळ कथासंग्रह नसून अनुभवी सैनिकाच्या नजरेतून मांडले गेलेले लष्करी जीवनाचे वास्तव आणि जगाच्या प्रवासातील अनुभवांचे मनमोहक वर्णन आहे, असे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी सुमित मलिक यांनी केले. कर्नल नंदकिशोर कुलकर्णी (सेवानिवृत्त) लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज्‌ बिट्‌विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी मलिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पूना क्लब, कॅम्प येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ब्रिगेडिअर व्ही. पी. सिंग (निवृत्त), कर्नल डॉ. विक्रांत श्रीवास्तव (निवृत्त), प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर मंचावर होते. हे पुस्तक आत्मस्तुतीपर नसल्याचे सांगून सुमित मलिक म्हणाले, या पुस्तकामधील कथांमधून मानवी स्वभावाच...

सई परांजपे यांच्या बालनाट्यातील ‘सिंड्रेला’ आणि ‘राणी’ने साधला बालकलाकारांशी संवाद

Image
सई परांजपे यांच्या बालनाट्यातील ‘सिंड्रेला’ आणि ‘राणी’ने साधला बालकलाकारांशी संवाद संवाद पुणेतर्फे सई परांजपे यांच्या सहा बालनाट्यांच्या महोत्सवाचे आयोजन अंजली फडके-जोशी व संध्या देवरुखकर यांच्या हस्ते संहिता पूजन   पुणे : ज्येष्ठ लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे लिखित ‘झाली काय गंमत’ या नाटुकलीतील ‘सिंड्रेला’ आणि ‘शेपटीचा शाप’मधील ‘राणी’ने आज बालकलाकारांशी संवाद साधला. निमित्त होते सई परांजपे यांनी लिहिलेल्या सहा बालनाट्यांच्या संहितापूजनाचे. संवाद पुणेतर्फे सई परांजपे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त सहा बालनाट्यांचा महोत्सव एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आला असून महोत्सवास सादर होणाऱ्या बालनाट्यांच्या संहितांचे पूजन परांजपे यांच्या बालनाट्यात ६० वर्षांपूर्वी भूमिका केलेल्या अंजली फडके-जोशी व संध्या देवरुखकर यांच्या हस्ते झाले. जोशी यांनी ‘सिंड्रेला’ची तर देवरुखकर यांनी ‘राणी’ची भूमिका साकारली होती. या वेळी ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, दिग्दर्शक देवेंद्र भिडे मंचावर होते. संवाद, पुणेची निर्मिती असलेल्या बालनाट्य मह...

हिंदू तरुणींनी फसवणूकीपासूनसावध व्हावे ----महेश पवळेसंस्थापक राजे शिवराय प्रतिष्ठान

Image
हिंदू तरुणींनी फसवणूकीपासून सावध व्हावे   ----महेश पवळे संस्थापक राजे शिवराय प्रतिष्ठान पुणे (प्रतिनिधी) "प्रेमाचे नाटक करून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत लव्ह जिहाद मध्ये अडकविले जात असल्याने त्यापासून सावध होण्याचे आवाहन "राजे शिवराय प्रतिष्ठान"चे संस्थापक महेश पवळे यांनी केले.कर्वेनगर येथील नटराज व गिरिजा शंकर वस्ती मधील नागरिकांसाठी स्वस्तिश्री सोसायटी द्वारा आयोजित सोसायटीच्या मैदानावर विराट हिंदू संमेलन आयोजित केले होते त्यावेळी महेश पवळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की,"हा एक सापळा असतो त्यात युवतींनी अडकता कामा नये त्यासाठी युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे.सकल हिंदू समाज सशक्त व सामर्थ्यवान बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.हिंदू परंपरा,संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण,संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे राहून कार्य करावे."असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका व इतिहासकार सायली गोडबोले-जोशी यांनी *पंच परिवर्तन* संदर्भात मनोगत व्यक्त केले.यावेळी पुणे स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखां...

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

Image
*एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी* *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन* पुणे प्रतिनिधी सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'युद्ध नको, बुद्ध हवा', हा संदेश जगासाठी उद्बोधक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ नीरज बोधी, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद, समानता, मान...