Posts

शाईफेक हल्ला.. . ‘विकास लवांडे’वर नव्हे…. तर.. ‘संतांचा महाराष्ट्र’ या लौकिका’वरचा हल्ला…!! ⁃ काँग्रेसने केला तीव्र निषेध...!!!

शाईफेक हल्ला.. . ‘विकास लवांडे’वर नव्हे…. तर.. ‘संतांचा महाराष्ट्र’ या लौकिका’वरचा हल्ला…!! ⁃ काँग्रेसने केला तीव्र निषेध...!!!  पुणे : स्वतःस तथाकथित वारकरी म्हणवणारे हल्लेखोर संग्राम भंडारे याने राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रवक्ते आणि प्रवचनकार विकास लंवाडे यांच्यावर केलेला भ्याड शाईफेक हल्ला, हा केवळ विकास लवांडे यांच्या पर्यंतच् मर्यादित नसून, देशाला दिशा देणाऱ्या, शिव छत्रपती, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेबा ते जगद्गुरु तुकोबारायांच्या सहिष्णू संस्कारांच्या शिकवणुकीवरचाच् हल्ला असून या निंदनीय शाईफेक हल्ल्याचा कॉंग्रेस तीव्र निषेध करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन केले.  गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, तथाकथित वारकरी म्हणवणारे संग्राम भंडारे यांनी या पुर्वीही काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमक्या देत, आपली झुंडशाहीची प्रवृत्ती दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मोठे जनआंदोलन ऊभारून त्या प्रकाराचा निषेध केला गेला होता, याचे किमान स्मरण तरी भंडारे यांनी ठेवायला पाहिजे होते. मात्र देशातील...

म्हणून कार्यकर्ता धरू शकतो परिसरावर पदर'आमदार हेमंत रासने यांच्यासह मान्यवरांनी केले मातृशक्तीला वंदन

Image
'.. म्हणून कार्यकर्ता धरू शकतो परिसरावर पदर' आमदार हेमंत रासने यांच्यासह मान्यवरांनी केले मातृशक्तीला वंदन पुणे प्रतिनिधी प्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष करून समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना खंबीर पाठिंबा देण्याचे कार्य त्यांच्या माता करीत असतात. त्या कार्यकर्त्यांना पदराखाली घेतात म्हणून कार्यकर्ता आपल्या संपूर्ण परिसरावर मायेचा आणि कार्याचा पदर पांघरू शकतो, असे प्रतिपादन आमदार हेमंत रासने यांनी केले. जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून जय गणेश व्यासपीठाच्या वतीने विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेल्या त्यांच्या मातांचा गौरव करण्यात आला. आमदार रासने यांच्यासह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते प्रसाद, महावस्त्र, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन मातांचा गौरव करण्यात आला. यावेळी युवराज निंबाळकर, उदय जगताप , शिरीष मोहिते ,विवेक खटावकर व राजा कदम मान्यवर उपस्थित होते, जय गणेश व्यासपीठ मधील...

लॉरिट्झ क्नुडसेनकडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार

Image
    लॉरिट्झ क्नुडसेनकडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबेअखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा

Image
पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा   पुणे : तुमच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाला आणि तुम्ही समाधानी असाल, तर प्रॉब्लेम आहे. असे करू नका, तुमच्या लिखाणात विविधता आणा, विविध प्रयोग करा. सिंदबादच्या सात सफरी आल्या पण पुढच्या कोणी का लिहिल्या नाहीत याचा विचार करणे आवश्यक आहे. आज बालसाहित्यिकांनी तीन पातळीवर काम करायला हवे. मराठीत काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय आहे, हे सर्व अभ्यासून लिखाण करणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी दिला. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.१०) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे मंचावर होते. क्षिप्रा शहाणे यांना लोखंडे-जोशी पुरस्कार, प्रिया फु...

पंडित सवाई गंधर्व यांच्या आठवणींना उजाळास्वरमयी गुरुकुलतर्फे किराना परंपरा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Image
पंडित सवाई गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा स्वरमयी गुरुकुलतर्फे किराना परंपरा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन   पुणे : पंडित सवाई गंधर्व हे गायकीतील एक विद्यापीठ होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुरू अब्दुल करीम खाँ यांनी सवाई गंधर्व यांना दिलेले गायनाचे धडे आणि पुढे गंधर्वांनी त्यावर घेतलेले कष्ट या सगळ्या प्रवासाला उजाळा देण्यात आला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना परंपरा’ या मालिकेतील आठव्या सत्राचे. यानिमित्ताने पंडित सवाई गंधर्व यांच्या सांगीतिक योगदानावर रविवारी (दि. १०) विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी पंडित सवाई गंधर्व यांच्या गायकीची मर्मस्थळे उलगडून सांगितली. या वेळी सवाई गंधर्व यांची काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणेही ऐकविण्यात आली, ती ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. सवाई गंधर्व यांनी खाँ साहेबांचे गायन आत्मसात करतानाच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सवाई गंधर्व यांची गायकी अंतर्मुख आणि त्याचवेळी बहिर्मुख करणारी होती हे उदाहरणादाखल सांगण्यात आले. खाँ साहेबांच्या मते गं...

नागरिकीकरणातून आदिवासी समाजाचे शोषण : डॉ. श्रीपाल सबनीसबहुरंग, पुणे आयोजित १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप

Image
नागरिकीकरणातून आदिवासी समाजाचे शोषण : डॉ. श्रीपाल सबनीस बहुरंग, पुणे आयोजित १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप   पुणे : संपूर्ण जगातील आद्य पुरुष म्हणजे आदिवासी जमात आहे. त्यांचे जग, जंगल, जमीन नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून आपण बळकाविली आहे आणि आदिवासी समाजाचे शोषण केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.   बहुरंग, पुणेतर्फे १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात आदिवासी कला पुरस्काराने प्रवीण चिंतामण खोरटे (नाशिक), मारोती दिवाकर टेकाम (राजूरा, चंद्रपूर) यांना गौरविण्यात आले. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस अध्यपदावरून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी मंचावर होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुधागड (मराठी) हा चित्रपट दाखविण्यात आला.   डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून ...

विकसित भारतासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे : राजदीप सरदेसाईभारती विद्यापीठाचा ६२ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

Image
विकसित भारतासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे : राजदीप सरदेसाई भारती विद्यापीठाचा ६२ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न पुणे : विकसित भारताचे स्वप्न साकारायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांबरोबरच उत्तम दर्जाचे शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार, प्रख्यात लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई यांनी केले.  भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिन समारंभात पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल राजदीप सरदेसाई यांचा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. दोन लाख एकावन्न हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, समारंभाचे अध्यक्ष कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील,...