Posts

आगरकर, दाभोळकरांचा महाराष्ट्र अंधारात चाचपडतोय : प्रा. मिलिंद जोशी

Image
आगरकर, दाभोळकरांचा महाराष्ट्र अंधारात चाचपडतोय : प्रा. मिलिंद जोशी आगरकर स्मृती पुरस्कराने शुभांगी देशपांडे तर डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने अनुराधा काळे यांचा गौरव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन पुणे : सध्या महाराष्ट्रात बुवाबाजीला ऊत आला असून प्रखर बुद्धीप्रामाण्यवादाची पदोपदी प्रतारणा केली जात आहे. समाजाची सद्‌सदविवेक बुद्धी दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. हे वैचारिक अध:पतन चिंताजनक आहे. देशाला प्रबोधनाचा प्रकाश दाखवणारा आगरकर-दाभोळकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडतोय, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील संतांचे कार्य समाजापुढे आणताना त्यांनी मांडलेला अध्यात्मवाद आणि निवृत्तीवाद केवळ पुढे आणला गेला. मात्र प्रवृत्तीवाद, अंधश्रद्धेविषयी असलेले प्रखर विचार समाजापुढे आणले गेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणेतर्फे आगरकर स्मृती पुरस्कराने शुभांगी देशपांडे तर डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने अनुराधा काळे यांना आज (दि.१२) गौरविण्यात आले. पुरस्कारांचे...

खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळवैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन

Image
खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळ वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन   पुणे : पुण्याने समाजाला ज्ञानदानाचे वरदान दिले आहे. पुण्याच्या माध्यमातून ज्ञानासह क्रीडा, संस्कृती जपण्याचे कामही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये मोठामोठ्या विद्यापीठ व महाविद्यालयांचा समावेश असला तरी खडकी शिक्षण संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेचा ११३ वर्षांचा इतिहास महनीय आहे. खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी मोठे कार्य करणारी वंदनीय व्यक्तीमत्वे निर्माण झाली आहेत, असे गौरवोद्‌गार केंद्रीय नागरी व विमान वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले. खडकी शिक्षण संस्थेच्या वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन आज (दि. ११ जुलै) मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. खडकी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, उपमहापौर परशुराम वाडे...

जगद्गुरू तुकोबा हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार : मुकुंद दातार मसाप आयोजित कार्यक्रमात प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्काराने दीपक फडणीस यांचा गौरव

जगद्गुरू तुकोबा हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार : मुकुंद दातार   मसाप आयोजित कार्यक्रमात प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्काराने दीपक फडणीस यांचा गौरव   पुणे : वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समन्वयाचे संस्कार देणारे संत तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार आहेत, म्हणूनच ते जगद्गुरू आहेत आणि जगभरात इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ते पोहोचले पाहिजेत. तसा उत्तम प्रयत्न दीपक फडणीस यांनी केला आहे, असे उद्गार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद दातार यांनी शनिवारी येथे काढले.   डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार दीपक फडणीस यांना डिव्हाईन व्हर्सेस अभंगगाथा (संत तुकाराम महाराजांच्या ५२ लोकप्रिय अभंगांचे इंग्रजी रूपांतर) या ग्रंथासाठी मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, डॉ. गोखले यांच्या कन्या डॉ. आनंदिनी क्षीरसागर, स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू हेही उपस...

शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम : तालयोगी पंडित सुरेश तळवलकरहोनराज मावळे लिखित ‘शिवभूपाल’ बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन

Image
‘शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम : तालयोगी पंडित सुरेश तळवलकर होनराज मावळे लिखित ‘शिवभूपाल’ बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन   पुणे : बंदिश हे संगीताचे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे जाण्याचा मार्ग आहे. बंदिशींमधील मुखडा हा त्यांची ओळख कायम ठेवतो कारण मुखड्यामध्ये सम असते. होनराज मावळे यांनी रचलेल्या ‘शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम आहेत. शिवचरित्र आणि संगीत असे दोन्ही विषय त्यांनी बंदिशींच्या माध्यमातून अतिशय समर्थपणे पेलले आहेत. या बंदिशी गायकाला गाता येणाऱ्या, विस्तार मांडता येणाऱ्या आहेत, हे त्याचे वैशिष्ट्य आहे, असे गौरवोद्‌गार पद्मश्री, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी काढले. ‘सृजनसभा पब्लिकेशन’तर्फे रचनाकार होनराज मावळे लिखित व रचित छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनप्रसंगांवर आधारित ‘शिवभूपाल’ या राग-तालबद्ध शास्त्रोक्त बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. ११) पंडित तळवलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता....

सहाव्या पीवायसी - रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत 7 नाईटस, किंग्ज 64, हुबळीकर विझार्ड्स संघांची विजयी सलामी

Image
याप्रसंगी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी, आणि महाराष्ट्रात बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रकाश कुंटे यांच्या दुःखद निधनाबद्त्याना पीवायसी क्लबच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी या स्पर्धातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला त्यांच्या स्मरणार्थ करंडक दिला जाणार आहे.  निकाल: पहिलीकुलकर्णी(0गुण); रेशमोना ग्लॅम्बिट्स पराभूत वि.किंग्ज 64: 2-7 आदित्य लाखे(1गुण) वि.वि.किरण खरे(0गुण) अमोल मेहेंदळे(0गुण) पराभूत वि.राजन जोशी(1गुण); मिहिर शहा(0गुण) पराभूत वि.जय केळकर(1गुण); सुधीर कुलकर्णी(0गुण) पराभूत वि.रोहिण लागू(1गुण); मकरंद दाते(1गुण) वि.वि.यश सारडा(0गुण); अमृता देवगावकर(0गुण) पराभूत वि.प्रियदर्शन डुंबरे(1गुण);  शैलेश लाखे(0गुण) पराभूत वि.संदीप तपस्वी(1गुण); रिशान डुंबरे(0गुण) पराभूत वि.रोहित कर्णिक(1गुण);  समीर वर्तक(0गुण) पराभूत वि.भार्गव वर्तक(1गुण);

आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !*

Image
*आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !*       पुणे - जीवनात कोणत्याही वेळी अपघाती प्रसंग किंवा वैद्यकीय मदतीची गरज उद्भवू शकते.अशा वेळी रुग्णालयात जाण्यापूर्वी मिळणारे प्रथमोपचार हे केवळ उपचार नसून ते जीवदान ठरू शकतात.सध्या सुरू झालेल्या आषाढी वारीसारख्या प्रवासादरम्यान किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर आजारासारखी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रत्यक्ष डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी रुग्णाची स्थिती अधिक बिघडू नये,याकरिता प्रथमोपचाराचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आषाढी वारी निमित्त 10 जुलै रोजी नाना पेठेतील श्रीराम मंदिर येथे सकाळी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, एरंडवणा या ठिकाणी सायंकाळी वारकरी बंधूंसाठी मोफत प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला 200 हून अधिक वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.        शिबिरातील सहभागी वारकऱ्यां ना प्रामुख्याने रुग्णा...

ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित**केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची टीका

Image
*ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित* *केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची टीका* पुणे : प्रतिनिधी ऑपरेशन टायगर हे भारतीय जनता पक्ष अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडवून आलेले नाही; तर ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते असून त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांना आपलेच लोक सांभाळता आले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असेही आठवले यांनी नमूद केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर,  प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, ॲड. मंदार जोशी, शाम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, अण्णा वायदंडे...