Posts

पारंपरिक मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन*गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; वेत्र चर्म, लाठी काठी प्रात्यक्षिके, ढोल ताशा वादन व महिलांच्या हस्ते शिवआरती

Image
*पारंपरिक मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन* गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; वेत्र चर्म, लाठी काठी प्रात्यक्षिके, ढोल ताशा वादन व महिलांच्या हस्ते शिवआरती  पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती... ढोल-ताशांचा गजर व शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण... रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण...पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला... अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  यावेळी अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्रचे महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब दादाराम जाधव -नाईक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, भविष्य निर्वाह निधी, भारत सरकार आयुक्त अमित वसिष्ठ, नगरसेवक स्नेहल माळवदे, ऐश्वर्या थोरात यांसह मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, ...

महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटित* माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी : डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या पुस्तकाचे प्रकाशन

Image
*महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटित*  माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी : डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : महाराष्ट्राचे ८० टक्के पाणी ऊस या एका पिकाला जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील सर्वाधिक महाराष्ट्रातच लागतात. त्यातही पुणे जिल्ह्यात टँकरची सर्वाधिक मागणी असते. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न देखील महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटित आहे. सर्वाधिक सिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहेत. ऊस या एका पिकाभोवती अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आणि या गोष्टी इतक्या गुंतलेल्या आहेत की, एक साखर कारखाना म्हणजे दोन आमदार अशी परिस्थिती आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.  सर्जन डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या आरोग्य विषयक पुस्तकाचे प्रकाशन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर, लेखक सर्जन डॉ. अनिल गांधी, पुस्तकाच्या संपादिका डॉ. हेमलता पिसाळ...

बांबूच्या वाढत्या उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना*- पाशा पटेल यांचे प्रतिपादन; 'आयएमडीआर' येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद, ‘बांबूकॉन’ प्रदर्शनाला भेट

Image
*बांबूच्या वाढत्या उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना* - पाशा पटेल यांचे प्रतिपादन; 'आयएमडीआर' येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद, ‘बांबूकॉन’ प्रदर्शनाला भेट पुणे: "बांबू उत्पादनांमध्ये नाविन्यता, कलात्मकतेचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. बांबू उत्पादनांबद्दल वाढत असलेली जागृती, तसेच राज्य सरकारकडून बांबू उद्योगाला प्रोत्साहन दिले जात असल्याने बांबूच्या उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. प्लास्टिकला पर्याय ठरू पाहणाऱ्या, शाश्वत पर्यावरणाला पूरक असलेल्या बांबू उत्पादनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे," असे प्रतिपादन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्याना हेक्टरी सात लाख रुपये अनुदान देण्याची योजना स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (आयएमडीआर) वतीने ‘सहकार चळवळीत बांबू : शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण’ तसेच ‘डेटाच्या आधारे नेतृत्व : धोरणे, नवकल्पना आणि प्रभाव’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि ‘बांबूकॉन’ प्रदर्शनाला भेट दिल्या...

कविता या विषयाला वाहिलेले दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन १५ मार्च रोजीज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषविणार अध्यक्ष पद

Image
                        कविता या विषयाला वाहिलेले  दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन १५ मार्च रोजी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषविणार अध्यक्ष पद पुणे, दि. ७ मार्च : काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार यांच्या वतिने कविता या विषयाला वाहिलेले ‘दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन २०२६’ हे रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत नवी पेठ, गांजवे चौक येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आले आहे. दुसर्‍या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने हे असतील. अशी माहिती अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संंपादक दत्तात्रय उभे आणि काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  या समेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय जगताप आणि उद्घाटक प्रसिद्ध उद्योजक व साहित्यप्रेमी प्रमोदकुमार बेलसरे असतील. समाजसेवक नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी, पहिल्या काव्यविश्व साहि...

पुण्यातील बाणेरमध्ये चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात

Image
पुण्यातील बाणेरमध्ये चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात पुणे, ६ मार्च २०२६… समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी, ६ मार्च रोजी बाणेर येथे चिन्मय विश्वविद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’ या नवीन संगीत शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. चिन्मय मिशनचे प्रमुख आणि चिन्मय विश्वविद्यापीठाचे कुलगुरू पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले. चिन्मय विश्वविद्यापीठ ही एक आगळीवेगळी संस्था आहे, जिथे प्राचीन गुरु–शिष्य परंपरेचा वारसा आधुनिक विद्यापीठीय व्यवस्थेसोबत जोपासला जातो. बाणेर येथे सुरू झालेल्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’मुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेण्याची आणि त्याचवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठीय पदवी मिळवण्याची एक अनोखी आणि समृद्ध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी बोलताना पुण्यातील ‘चिन्मय नाद बिंदू’च्या संचालिका तसेच ‘स्कूल ऑफ कलायोगा’च्या प्रमुख प्रमोदिनी राव म्हणाल्या, “भारत हा प्राचीन ज्ञानपरंपरा आणि तत्त्वज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या मूळांशी नाळ जोडणे अत्यंत महत्त्वाचे आ...

भांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव; दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम*

Image
*भांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव; दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम* पुणे, दि. ६ मार्च : दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ११ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत ‘१००८ आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भक्तामर कलश तीर्थ परिसरात कलशाकार मंदिर, नवग्रह रत्नमय प्रतिमा, नद्यावर्तात १०८ आदिनाथ जिन प्रतिमा, भक्तामर ध्यान केंद्र व हीलिंग सेंटर, भक्तामर शास्त्र मानस्तंभ, महाद्वार, नवधा भक्ति भोजनालय, संत निवास व यात्रेकरू विश्रामालय, आरोग्य धाम (अस्पताल) तसेच पूजन साहित्य उपलब्ध करून देणारे भांडार अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या यानिमित्ताने दिगंबर जैन राष्ट्रसंतांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम येथे होणार आहे. महोत्सवात १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर ज्योतिष सम्मेलन’, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर हीलर महोत्सव’ तसेच ४८००० मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाणार आहे. याशिवाय ‘जैन अल्पसंख्याक योजना – स...

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !

*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !* दिनांक : ०६.०३.२०२६ *हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!* *वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*  _*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश*_    *मुंबई/रत्नागिरी :* वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दांत ‘कानउघडणी’ केली. त्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्यस्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक व पात्रांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे.      *नेमके प्रकरण काय? :* रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निर्माता श्री. जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज, लांजा निर्मित श्री. ...