Posts

करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाचा प्रेरणादायी उत्सव – मानव एकता दिवस**संत निरंकारी मिशन तर्फे फॉरेस्ट पार्क,चंदननगर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५५१ युनिट रक्तदान*

Image
*करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाचा प्रेरणादायी उत्सव – मानव एकता दिवस* *संत निरंकारी मिशन तर्फे फॉरेस्ट पार्क,चंदननगर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५५१ युनिट रक्तदान*  पुणे दि. २५ एप्रिल २०२६:* हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की, मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला; ‘मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला. ‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवर हा दिवस श्रद्धा व समर्पणभावाने यशस्वीरीत्या पार पडला. हे केवळ एक आयोजन नव्हते, तर प्रेम, सद्भावना आणि निष्काम सेवेचे प्रभावी प्रतिबिंब म्हणून ते सर्वत्र उमटले. मानव एकता दिवसानिमित्त संत निरंकारी सत्संग भवन ,फॉरेस्ट पार्क,चंदननगर, पुणे येथे विशाल रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यशवंतर...

शाहिरी आणि कीर्तन हे समृद्ध परंपरेची दोन भक्कम अंग*राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांचे मत : लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना प्रदान ; वीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान

Image
*शाहिरी आणि कीर्तन हे समृद्ध परंपरेची दोन भक्कम अंग* राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांचे मत : लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना प्रदान ; वीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान पुणे : कीर्तनकारांनी देखील शाहिरीवर मनापासून प्रेम केले आहे. शाहिरी आणि कीर्तन ही आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची दोन अत्यंत भक्कम आणि प्रभावी अंग आहेत. या दोन्ही कलाप्रकारांनी समाजप्रबोधन, संस्कार आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केले. शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे शनिवार वीर मारुती उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'लोकपरंपरा पुरस्कार' देण्याची परंपरा सुरू झाली आहे. या वर्षीचा 'लोकपरंपरा पुरस्कार' आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गोपालकृष्ण दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, अ‍ॅड.प्रवीण जोशी, शकुंतला दहाड, राम दहाड व सहकारी मंडळी उपस्थित होते....

भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही*रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे : आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा

Image
*भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही* रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे : आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा पुणे: मध्यपूर्वेत तणाव असूनही भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे. काळजीचे काहीही कारण नाही. इंधनाच्या किमतींमुळे होणारी महागाई ही ‘इम्पोर्टेड इन्फ्लेशन’ आहे. ती फार वाढणार नाही. डॉलरच्या बदल्यातील घसरणीवरही चर्चा होते, पण जीडीपीच्या तुलनेत ही तूट फार मोठी नाही. ही तूट मागील २.५ वर्षांत १ % ते १.५ % दरम्यान होती आणि अनेक महिन्यांत ती सकारात्मकही होती. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही, असे मत रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान आणि अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डेक्कन येथील गोखले इन्स्टिट्यूट जवळील मानव विकास संस्था (सारथी) पुणे येथे सन्मान सोहळा संपन्न झाला...

AIच्या युगात रोजगाराचा प्रश्न गंभीर आव्हान; सरकारच्या सक्रिय धोरणांची गरज अत्यावश्यक – राजेश अग्रवाल.

AIच्या युगात रोजगाराचा प्रश्न गंभीर आव्हान; सरकारच्या सक्रिय धोरणांची गरज अत्यावश्यक – राजेश अग्रवाल. पुणे : प्रतिनिधी देशात आणि जगभरात वेगाने वाढत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे लाखो लोकांच्या रोजगारावर होत असलेल्या परिणामाबाबत अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन (AMCCIE) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, तांत्रिक प्रगती अपरिहार्य आहे, मात्र त्यातून निर्माण होणारा रोजगारातील असमतोल हा एक मोठा सामाजिक व आर्थिक प्रश्न बनत चालला आहे। ते म्हणाले, “AI आणि नवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक नोकऱ्यांमध्ये घट होत असून मोठ्या प्रमाणावर लोक प्रभावित होत आहेत. हा विषय केवळ आर्थिक नसून सामाजिक स्थैर्याशीही संबंधित आहे।” मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले की प्रत्येक तांत्रिक बदलासोबत नवीन संधीही निर्माण होत असतात. “AI रोजगार संपवत नाही, तर रोजगाराचे स्वरूप बदलते. त्यामुळे आपल्या कार्यबलाला री-स्किलिंग आणि अप-स्किलिंग द्वारे भविष्याकरिता तयार करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले। राजेश अग...

State Boxing Championship Held with Enthusiasm at MIT ADT University, Pune

Image
State Boxing Championship Held with Enthusiasm at MIT ADT University, Pune Loni-Kalbhor (Pune): A state-level invitational boxing championship was held with great enthusiasm at MIT Art, Design and Technology (ADT) University on the occasion of the 60th birthday of Executive President and Pro-Vice Chancellor Prof. Dr. Mangesh Karad. The competition featured both men’s and women’s categories across multiple weight divisions including welterweight, bantamweight, lightweight, light middleweight, middleweight, light heavyweight, cruiserweight and heavyweight. The event was inaugurated by Arjuna Award-winning boxer Captain Gopal Devang and Olympian and Arjuna Awardee boxer Manoj Pingale. Dignitaries present on the occasion included Vice-Chancellor Prof. Dr. Rajesh S., Provost Dr. Sayali Ganakar, Director of Sports Prof. Padmakar Phad, Dr. Atul Patil and others. At the conclusion of the event, winners across all weight categories were awarded gold medals, while runners...

महापुरुषांच्या प्रेरणादायक स्मृती जागवणाऱ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्याचे उपमहापौरांचे आदेश**महात्मा फुले जन्म द्विशताब्दी व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*महापुरुषांच्या प्रेरणादायक स्मृती जागवणाऱ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्याचे उपमहापौरांचे आदेश* *महात्मा फुले जन्म द्विशताब्दी व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन* पुणे प्रतिनिधी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मद्वीशताब्दी, चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी आणि महात्मा फुले यांच्या नगरसेवक पदाची दीडशे वर्ष या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व उपक्रमांचे आयोजन करण्यास स्थायी समितीने मान्यता सर्वसाधारण सभेत दिली असून या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सभापती पदावर असताना दिले आहेत. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मद्वीशताब्दी, चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी आणि महात्मा फुले यांच्या नगरसेवक पदाची दीडशे वर्ष यामुळे हे वर्ष सामाजिक सुधारणा वर्ष म्हणून साजरे करावे. महात्मा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जावे,...

आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

Image
 आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न  आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. आगापे इन्स्टिट्यूट तर्फे 24 विद्यार्थ्यांचा ईश्वरविज्ञान अभ्यासक्रमाचा पदवीदान कार्यक्रम कॅम्प येथे प्रिन्सिपॉल जोमन मॅथ्यूज व डॉ.डब्ल्यू एस ॲनी यांच्या हस्ते सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे पास्टर रॉबिन महाडकर,  पास्टर.अनिल गडकरी सर, पास्टर राजेश केळकर, बिशप प्रदीप वाघमारे, इत्यादी उपस्थित होते. यावेळी जॉइल्स त्रिभुवन, संगीता आरसूड, अंजना गुरव, मारिया देठे यांना गुणवत्तेसाठी विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच 84 व्या वर्षी रजनी साळवे यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून आपले अष्टपैलूत्त्व सिद्ध केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पा. राजेश केळकर, यांनी केले तर आभार रजनी साळवे यांनी मानले.