Posts

शंभूबलिदान दिन हा 'महामृत्युंजय रक्तदान दिन' म्हणून जाहीर करावा* अमित गायकवाड यांची महाराष्ट्र सरकारला मागणी ; शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे राजव्यापी भव्य रक्तदान मानवंदनेचे आवाहन

Image
*शंभूबलिदान दिन हा 'महामृत्युंजय रक्तदान दिन' म्हणून जाहीर करावा*  अमित गायकवाड यांची महाराष्ट्र सरकारला मागणी ; शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे राजव्यापी भव्य रक्तदान मानवंदनेचे आवाहन पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस 'महामृत्युंजय रक्दान दिन' म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपूर्ण महाराष्ट्रातून रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी, अशी मागणी शिवजयंती महोत्सव समिती, पुणेचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे. बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पूल डी पी रस्ता येथे सकाळी ९ ते ६ या वेळेत भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवजन्मोत्यव स्वराज्यरथ सोहळ्यातील वीर स्वराज्यघराणी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा संघटना, सहकार, शिक्षण संस्था, वाहतूक संस्था, ढोलताशा पथके उपहार गृह संघटना, सिने कलाकार संघटना यासह विवीध क्षेत्रातील नागरिक सहभागी होणार आहेत.  अमित गायकवाड म्हणाले, ज्या स्वराज्यरक्षक धर्मव...

योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९५ पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन* कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन

Image
*योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९५ पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन*    कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९५ पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प.पू.माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे याचे पूजन महाराजांच्या ९० व्या पुण्यतिथी दिनी मंदिरात करण्यात आले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांसह ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे समाधी दिन, हा दिवस नाथषष्ठीचा. प.पू. माधवनाथ महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्य...

*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडसाठीच्या पाठपुराव्याला मोठे यश**कोथरुड मधील पानशेत पुरग्रस्तांचा बहुप्रलंबित प्रश्न मार्गी

*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडसाठीच्या पाठपुराव्याला मोठे यश* *कोथरुड मधील पानशेत पुरग्रस्तांचा बहुप्रलंबित प्रश्न मार्गी* राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, कोथरुड मधील पानशेत पूरग्रस्तांचा वर्षानुवर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना मालकी हक्क बहाल केला आहे. त्याबद्दल पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत. १२ जुलै १९६१ रोजी पुण्यात पानशेत धरण फुटीमुळे झालेल्या भीषण पुरात सुमारे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू आणि ६५,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. या दुर्घटनेनंतर पानशेत पूरग्रस्तांना शहराच्या वेगवेगळ्या भागांत पुनर्वसन करण्यात आले. आज ही त्या जागांवर सध्या तिसरी पिढी राहात आहे. तरीही, त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. पूरग्रस्तांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तसेच, त्यांची वाढीव बांधकामे नियमित करण्याता प्रश्न रखडला ह...

पंचपरिवर्तनाद्वारे विश्वगुरू भारत घडावा**दिलीप क्षीरसागर यांचे आवाहन*

Image
*पंचपरिवर्तनाद्वारे विश्वगुरू भारत घडावा* *दिलीप क्षीरसागर यांचे आवाहन* *पुणे* : विश्वगुरू भारत बनण्यासाठी सामान्य नागरिकांनी पंचपरिवर्तनाचे आचरण करणे आवश्यक आहे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने श्री तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात संघशताब्दी निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने संघकार्याचा आढावा घेताना क्षीरसागर पुढे म्हणाले की समाज संघटनेचे महत्त्व हिंदू समाजाला समजलेले असल्यामुळे आता हिंदू समाज समर्थन व सहभाग देत आहे. संघशताब्दी वर्षात सामान्य नागरिकांनी वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात पंचपरिवर्तनाच्या आचरणाचे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले.  स्वबोधद्वारे भारतीय परंपरांचा अभिमान आग्रह व आचरण महत्त्वाचे असून सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी समरसतेचा भाव मनात जागृत करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी वृक्षसं...

सुवर्णा माने यांची अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती.

Image
सुवर्णा माने यांची अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप व प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाचे अध्यक्षा विद्या कदम यांच्या हस्ते डेक्कन भांडारकर रोड येथील रविराज हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये देण्यात आले. महिलांचे कुटुंबाबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे असे प्रतिपादन विद्या कदम यांनी केले.  यावेळी ॲड, धनंजय बुद्धिवंत, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक ख्रिश्चन विभागाचे अध्यक्ष डॉ मॅन्युअल डिसोजा, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना शहा, राज्य महिला सचिव मेघा शेगर, महिला राज्य उपाध्यक्षा ॲड, रेखा माने, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मुमताज शेख, निवृत्त पोलीस निरीक्षक आनंद जंगम, अलिशा बुद्धिवंत, वनिता जाधव आदि यावेळी उपस्थित होते.

*चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान जाहीर!**'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांना 'ध्यास सन्मानाने' तर प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्मानाने गौरव!

Image
*चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान जाहीर!* *'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांना 'ध्यास सन्मानाने' तर प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्मानाने गौरव!* *मुंबई(९ मार्च २०२६) :* गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम 'ॲड फिझ' करतो. यानिमित्ताने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेसाठी अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्यांना “ध्यास सन्मानाने” गौरविले जाते. यंदाचा हा सोहळा गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवीं, मुंबई येथे संपन्न होणार आहे.  आत्तापर्यंत या दिग्गजांना चैत्र चाहूल मध्ये गौरविले गेले.   गेल्या एकोणीस वर्षात ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ते मान्यवर: सुलभाताई देशपांडे, गुरू पार्वती कुमार, राजा मयेकर, मधुकर तोरडमल, प्रा. शंकर वैद्य, सुलोचना चव्हाण, प्रा. वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सूनिल शानबाग, संध्या पुरेचा आणि ज्यांचा सन्मान केला ते ध्यास पुरस्कार: अरुण होर्णेकर, स...

मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा शुभारंभ

Image
मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा शुभारंभ पुणे, ८ मार्च २०२६ : मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे अत्याधुनिक सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी नगर, भोसरी येथील रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड चारोळी मोशी हाउसिंग सोसायटी असोसिएशनचे प्रतिनिधी संजीवन सांगळे तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश प्रभुणे उपस्थित होते. नवीन सुरू करण्यात आलेल्या या सेवांद्वारे कॅन्सर तसेच गंभीर भाजलेल्या रुग्णांसाठी निदान, शस्त्रक्रिया, अतिदक्षता उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन उपचार अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर पुणे परिसरातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या ...