Posts

कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक - दिग्दर्शक मधुर भांडारकर*

Image
*कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक - दिग्दर्शक मधुर भांडारकर*   *अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट २०२६ उत्साहात पार; चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी दिले यशाचे मंत्र*   *दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णी, राहुल सोलापूरकर यांच्यासह मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन; नवोदित कलाकारांना मिळाली प्रेरणा*  पुणे : दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली "अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट – २०२६" उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. राज्यभरातून मोठ्या संख्येने नवोदित कलाकार, अभिनयप्रेमी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी पद्मश्री आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पूसाळकर, दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कोरे, साऊथ स्टार अभिनेता रवी प्रकाश, प्रसिद्ध का...

जन संघर्ष समिती पुणे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कलाकार कट्टा, डेक्कन येथे उत्साहात साजरी

Image
जन संघर्ष समिती पुणे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कलाकार कट्टा, डेक्कन येथे उत्साहात साजरी दिनांक 26 जून रोजी सालाबाद प्रमाणे शाहू महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. ह्या वर्षी उत्सवाची सुरुवात कर्नल रणजित नलावडे, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कर्नल नलावडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की शाहू महाराजांचे विचार चिरकाल आहेत. या वेळी काँग्रेस पुणे शहर प्रमुख दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. पुणे मनपा उपमहापौर श्री परशुराम वाडेकर व पुणे मनपा विरोधी पक्ष नेते अँड नीलेश निकम यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास जन संघर्ष समिती चे अध्यक्ष ॲड रविंद्र रणसिंग, शामकांत पाटील, न्या. बी जी कोळसे पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ, हेमंत पाटील, विकास देशपांडे, अशोकराव धिवरे, संतोष पवार, पृथ्वीराज काकडे, मुकुंद काकडे, विनायक गाडे, संदीप ताम्हणकर, किशोर सरदेसाई, दत्तात्रय जाधव, रवी देशमुख, अक्षय काटे, ॲड बापूसाहेब हांडे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी जन संघर्ष समिती कडून नागरिकांना 150 किलो लाडू चे व...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतीत पावन संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतीत पावन संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन  बहुजनांचे कैवारी आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतित पावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हस्ते आरटीओ शेजारील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.  यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपानराव देशमुख, सरचिटणीस नितीन सोनटक्के, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, राजाभाऊ पाटील, सचिव मनोज नायर, आदि उपस्थित होते.

लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावापहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी

Image
लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी पुणे: प्रतिनिधी समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय असला तरी प्रत्यक्षात खुद्द लोक कलावंत अद्यापही उपेक्षितांचे जगणे जगत असून त्यांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी केली. लोककलावंतांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचाव्या, लोककलावंतांमध्ये विचारांचे आदान प्रदान व्हावे व विविध लोककलांचा रसिकांना परिचय व्हावा, या दृष्टीने राज्याचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने या वर्षापासून समरसता लोककला संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी नर्तिका मधू कांबीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्य...

कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंककरम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद

Image
कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्र मास प्रतिसाद   पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत असते. कविता लिहायची असेल तर त्यासाठी मनाची मशागत क रावी लागते. इतरांनी काय लिहिले आहे याचेही वाचन केले पाहिजे. मनन , चिंत नातून तुम्ही घडत जाता. कविता वाच न हे एकप्रकारचे सादरीकरण असते. त्यामुळे कविता सादर करताना कुठल्या श ब्दानंतर थांबावे , कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे कळ ले तरच कवितेचे सादरीकरण उत्तम होते आणि कविता नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोचते , अ से प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ.   स्वाती महाळंक यांनी केले.   करम प्रतिष्ठानतर्फे आयोजित करम रजनीगंधा या कार्यक्रमाचे रविवारी सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. महाळंक बोलत होत्या. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर , ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या सदस्या स्वाती सामक , ज्योत्स्ना चांदगुडे , प्रभा सोनवणे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. मीना शिंदे यांनी प्रथम सत्राचे ...

भारत-भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन होणार जयपूरलालोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांचे वितरण

Image
भारत-भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन होणार जयपूरला लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांचे वितरण भारत-भारतीच्या उपक्रमात युवा पिढीला जोडण्यासाठी संमेलन घेण्याची घोषणा भारत-भारतीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विनय पत्राळे यांची फेरनिवड   पुणे : राष्ट्रीय एकात्मता, संस्कृती आणि संघटन या त्रिसूत्रीचा अवलंब करून वाटचाल करीत असलेल्या भारत-भारतीच्या पुणे येथे आयोजित पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज (दि. २९) समारोप झाला. सहावे अधिवेशन जयपूर (राजस्थान) येथे घेण्याची घोषणा करण्यात आली असून भारत-भारतीच्या कार्यात युवा वर्गाचा सहभाग वाढावा यासाठी केवळ युवकांचे संमेलन भरविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने डॉ. भास्करदत्ता गोस्वामी (इशान्य भारत), प्रमोद परमार (नेपाळ), छाया निजप्पा (कर्नाटक) यांचा गौरव करण्यात आला.   अधिवेशन जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री) गंगाधाम रोड येथे आयोजित करण्यात आले होते. आघाडीचे उद्योजक डॉ. प्रकाश धोका यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत-भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनय पत्राळे, स...

डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस

Image
डॉ. शमसु द्दि न तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस   मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान   पुणे : राजकारण आणि समाजकारण क्रूर व हिंसक होत आहे. गांधीवादी मंडळींनाही नक्षलवादी ठरवले जात आहे. अशा विपरीत परिस्थितीत कुराणापेक्षा संविधान श्रेष्ठ मानणा ऱ्या, विवेकवादी , तत्त्वनिष्ठ आणि कृतीशील कार्यकर्ता म्हणून वावरणा ऱ्या डॉ. शम सुद्दिन तांबोळी यांचा सन्मान भाई वैद्य यांच्या नावाच्या पुरस्काराने होणे , अन्वर्थक आहे. या निमित्ताने लोकशाही समाजवादाचा आवाद बुलंद व्हावा , असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.   मनोहारी मैत्र संघ , पुणे यांच्यातर्फे लोकनेते भाई वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कार २०२६ , मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसु द्दिन तांबोळी यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संविधान प्रत , शाल , श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एस. एम....