Posts

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी: विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै*

Image
*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी: विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै* पुणे: स्व. माजी कार्यसम्राट आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विनायकी:विनायक गौरव शिष्यवृत्ती’ उपक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ५ जुलै ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांनी www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे. स्व. विनायक (आबा) निम्हण यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात शिक्षण, आरोग्य ,कला आणि सामाजिक विकास या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य दिले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा त्यांचा कायम प्रयत्न होता. त्यांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा जपत सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. ‘विनायकी: विन...

गणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला 'एका eka मोबिलिटी' कडून गणेशभक्तांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रदान

Image
*गणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला 'एका eka मोबिलिटी' कडून गणेशभक्तांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रदान पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाची, पावसाची किंवा ज्येष्ठांसाठी चालण्याची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाची देणगी देण्यात आली. शनिवार वाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर ही सेवा मोफत मिळणार आहे.  गणेशभक्तांच्या सेवेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला 'एका eka मोबिलिटी' कडून हे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन नुकतेच प्रदान करण्यात आले. सुधीर मेहता यांच्या कंपनीच्या वतीने हे वाहन ट्रस्टला सुपूर्द करण्यात आले असून त्याचा स्वीकार ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी 'एका eka मोबिलिटी'च्या सुनंदा मेहता...

विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’

Image
*विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’* पुणे | प्रतिनिधी विशेष गरजा असलेल्या मुलांकडे समाजात अनेकदा दयेच्या भावनेने पाहिले जाते. मात्र, योग्य प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ही मुलेही स्वावलंबी व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतात, हा विश्वास प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे साहस फाउंडेशन गेल्या नऊ वर्षांपासून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. सन २०१७ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सतीश खराडे यांनी स्थापन केलेली साहस फाउंडेशन ही पूर्णपणे ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी संस्था असून पुणे व मुंबई परिसरातील शेकडो विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करत आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट विशेष मुलांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि जीवनकौशल्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम व स्वावलंबी बनविणे हे आहे. संस्थेची ३५ सदस्यांची समर्पित टीम विशेष मुलांच्या घरी जाऊन त्यांना शारीरिक तंदुरुस्ती, शरीराचा समन्वय, संतुलन, क्रीडा कौशल्ये, दैनंदिन जीवनातील स्वावलंबन तसेच सामाजिक कौशल्यांचा विकास यासाठी नियमित प्रशिक्षण देते. प्रत्येक मुलाने भविष्यात शक...

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश !* 🚩*बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ⁉️* - रमेश शिंदे

Image
*🔥‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश !* 🚩 *बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ⁉️* - रमेश शिंदे  पुण्यातील ऐतिहासिक 'महात्मा फुले वाडा' परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी अखेर शासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात निवेदने देऊन ही संभाव्य बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली होती. याला संघटित प्रयत्नांमुळे मोठे यश आले असून प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.  हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील आघात असल्याचे निवेदनात म्हटले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या या तीव्र आंदोलनाची आणि मागण्यांची नोंद घेत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठ...

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती ! -* सुराज्य अभियान_*झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !*_

Image
दिनांक : ०३.०७.२०२६ *पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती ! -* सुराज्य अभियान _*झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !*_  *मुंबई :* पावसाळ्यात वारंवार झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, झाडांच्या मुळांभोवती होणारे बेकायदेशीर काँक्रीटीकरण, वृक्षछाटणीत होणारा निष्काळजीपणा, प्रशासकीय बेपर्वाई आणि राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आदेशांच्या उघड उल्लंघनातून निर्माण झालेली मानवनिर्मित आपत्ती आहे, असा गंभीर इशारा ‘सुराज्य अभियान’ने आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेत *‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे* यांनी राज्यभर वाढत्या झाडे पडण्याच्या घटनांकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर सुद्धा उपस्थित होते.   *श्री. मुरुकटे म्हणाले की* , दरवर्षी पावसाळ्यात शेकडो झाडे पडतात, रस्ते बंद होतात, वाहनांचे नुकसान होते, नागरिक जखमी होतात आणि निष्पाप न...

विद्यार्थ्याचे वर्ष धोक्यात, तरीही शिक्षणमंत्री आणि बालहक्क आयोग गप्प का?***कायदेशीर नोटिशीची मुदत संपली; 'सीबीएसई'च्या मनमानीविरोधात आता थेट हायकोर्टात याचिका*

**मुंबई / पुणे :* केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) संकेतस्थळातील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील एका होतकरू विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत बजावण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशीची ७ दिवसांची मुदत आता संपुष्टात आली आहे. मात्र, राज्याचे व केंद्राचे शिक्षणमंत्री आणि बालहक्क आयोगासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणांनी यावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे आता या अन्यायाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) रिट याचिका दाखल करण्याची अंतिम तयारी सुरू झाली आहे. **या बड्या जबाबदारांकडून प्रतिसाद शून्य:** विद्यार्थ्याचे वकील अधिवक्ता धनंजय जुन्नरकर यांनी १९ जून २०२६ रोजी 'स्पीड पोस्ट' आणि ई-मेलद्वारे सर्व संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावली होती. कारवाईसाठी दिलेली ७ दिवसांची मुदत संपूनही खालील प्रमुख यंत्रणांनी कोणतीही दखल घेतलेली नाही:  * **धर्मेंद्र प्रधान** (मा. केंद्रीय शिक्षणमंत्री)  * **दादासाहेब भुसे** (मा. शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य)  * **अध्यक्ष, महाराष्ट्र ...

रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले-नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

Image
रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले -नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते पुणे:- गेल्या काही वर्षांपासून मी निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आहे. त्यामुळे आता मला शहरातील माणसे, टोलेजंग इमारती आणि मोठाल्या गाड्यांची भिती वाटू लागली आहे. या रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले आहे, ही जाणीव वेदना देणारी आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.  विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने ज्येष्ठ लेखक अनंत सामंत लिखित आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित 'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि अभिवाचन कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रमुख अतिथी नाना पाटेकर बोलत होते. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विदिशा विचार मंचचे समन्वयक पंकज क्षेमकल्याणी यांची होती. कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, प्रसिध्द कवी संदीप खरे, प्रसिध्द अभिनेत्री नेहा जोशी, विदिशा विचार मंचच्या...