Posts

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न!

Image
*भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न!* *'रामराज्या'च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती* *भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*  *मुंबई* : सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताला चारी बाजूंनी अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे, या मुख्य उद्देशाने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ अत्यंत चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. सनातन संस्थेच्या वतीने प्रभादेवी, मुंबई येथील नर्दुल्ला टँक मैदानात आयोजित या महायज्ञाला ७००० हून अधिक भाविकांनी हजेरी लावली. राष्ट्ररक्षण, देशाची सर्वांगीण प्रगती आणि ‘रामराज्या’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, हा या आयोजनामागील मुख्य संकल्प होता. या वेळी आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य त्रिपाठी, स्वातंत्रवीर स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रवींद्र प्रभूदेसाई यांच्यासह विविध क्षेत्राती...

एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धामुलांच्या गटात अलौकिक सिन्हा विजेतामुलींमध्ये सई पाटील हिला विजेतेपद

Image
एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य  फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा मुलांच्या गटात अलौकिक सिन्हा विजेता मुलींमध्ये सई पाटील हिला विजेतेपद  पुणे दिनांक १७ मे २०२६ एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षाखालील गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेतील मुलांच्या गटात पुण्याचा अलौकिक सिन्हा (७ गुण)विजेता ठरला तर मुलींमध्ये पुण्याचीच सई पाटील (७ गुण) हिने विजेतेपद मिळविले.  गणेश सभागृह व अश्वमेध कार्यालय या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्ट सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांचे तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या गटात विजेतेपद मिळविणारा अलौकिक सिन्हा हा हिंजवडी येथील ब्ल्यू रिज प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे. त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. वीरेश शरणार्थी, अयान सोमानी (पुणे), मानस गायकवाड (सोलापूर) सर्व ६.५ गुण यांनी अनुक्रमे दोन ते चार क्रमांक पटकाविले.  मुलींच्या गटात सई पाटील (पुणे) व ईश्वरी जगदाळे (सांगली) यांचे प्रत्येकी सात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान देण्यात आले. सई पाटील ही पवार पब्लिक स्कूल मध्ये दहाव्या इयत...

*केवळ ‘युद्धजन्य परिस्थिती’मुळे नव्हे, ‘परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने देशात ‘आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती’..!काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची घणाघाती टीका …

*केवळ ‘युद्धजन्य परिस्थिती’मुळे नव्हे, ‘परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने देशात ‘आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती’..!काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची घणाघाती टीका …* पुणे  : देशाचे ‘सतत बदलते व अस्थिर परराष्ट्र धोरण’, देशात पसरत चाललेली अशांतता व बिघडत चाललेला सामाजिक सलोखा, वाढता कट्टरतावाद व अमेरीकेच्या दबावाखाली भारत स्वीकारत असलेल्या सततच्या समझोत्याच्या भुमिके’मुळे देशास आयात - निर्यातीसाठी अमेरिकेचे अन्यायकारक ट्रेड डील व वाढते टॅरीफ’दर स्वीकारावे लागत असून, या सर्व हालाखीच्या स्थितीत कंटाळून देशातील परकीय गुंतवणूकदार हे गेल्या काही महिन्यांपासून (२०२६ मध्ये) भारतातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर काढून घेत असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.भारतातील परकीय गुंतवणूकदारांनी सुमारे  १ कोटी ८० लाख परकीय गुंतवणूक देशाबाहेर नेल्याचा अहवाल ‘फायनाशियल टाईम्स’ ने नुकताच जारी केल्याचा संदर्भ देत काँग्रेस ने देश हिताच्या, लोकशाही वादी ‘सत्यशोधक, वास्तववादी व निर्भिड पत्रकारीतेचे’ अभिनंदन केले.  ते पुढे म्...

आर्ट मॅजिक'मध्ये बालचित्रकार ते हौशी कलाकारांचा कलाविष्कारआर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे चित्र प्रदर्शनाचे आयोजन : प्रदर्शनाचे १९ वे वर्ष

Image
'आर्ट मॅजिक'मध्ये बालचित्रकार ते हौशी कलाकारांचा कलाविष्कार आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे चित्र प्रदर्शनाचे आयोजन : प्रदर्शनाचे १९ वे वर्ष पुणे : निसर्गचित्रांच्या मनोहारी रंगछटा, महादेव, कृष्ण, गणपती यांसारख्या देवी-देवतांची विविध शैलींमधील आकर्षक चित्रे, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची हुबेहूब रेखाटने, चारकोल माध्यमातील प्रभावी कलाकृती आणि प्रसिद्ध स्थळांची देखणी चित्रे यामुळे ‘आर्ट मॅजिक २०२६’ प्रदर्शन कला रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. कलर पेन्सिल, पोस्टर कलर, अॅक्रेलिक, ऑइल पेंटिंग आदी विविध माध्यमांतून साकारलेल्या कलाकृतींमध्ये वयाच्या अवघ्या तीन वर्षांच्या बालचित्रकारांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तसेच हौशी चित्रकारांची कल्पकता आणि सर्जनशीलता पुणेकरांना अनुभवायला मिळाली. आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्ट मॅजिक २०२६’ या १९ व्या चित्रकला प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्व कलादालन येथे या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्या हस्ते पारितोषिक ...

द. मा. मिरासदार हे साहित्यविश्वातील मोठी स्मरणशिळा : राजा दीक्षित सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान

Image
द. मा. मिरासदार हे साहित्यविश्वातील मोठी स्मरणशिळा : राजा दीक्षित   सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान   पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यविश्वातील एक मोठी स्मरणशिळा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहासअभ्यासक व मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी काढले. द. मा. मिरसदार प्रतिष्ठानच्या वतीने द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित केलेल्या द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ‘गोष्ट इथे संपत नाही...’ हे कथाकथन करणारे युवा कथाकथनकार सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिंदेशाही पगडी, शाल, तुळशीची माळ, विठ्ठलाची मूर्ती, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, द. मा. मिरासदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, विश्वस्त हरीभाऊ मिरासदार, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बीएमसीसीचे...

प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार

Image
प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार प्रतिभेऐवजी सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम : कौशल इनामदार गझलविधा समूहातर्फे ‘गझलविधा’ संमेलनात २५ गझलकारांचे सादरीकरण पुणे : शब्दांमधून शब्दांपलिकडचे सांगण्याचे कार्य कवी करत असतात. त्यामुळे चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक आहे. प्रतिभावंतांची प्रतिभा ही समाजासाठी वरदान असली तरी कलावंताला असलेला तो शाप असतो. कवी-गझलकार-लेखकाने आपण का लिहितो याचा विचार परखडपणे केला तर तो कागदाला लेखणी लावताना दचकून जाऊ शकतो. आजच्या साहित्यिकाकडे ते दचकणे दिसत नाही पण सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम माजलेले दिसते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केले. गझलविधा समूहातर्फे रविवारी (दि. १७) एक दिवसीय ‘गझलविधा’ या गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात कौशल इनामदार अध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, गझलविधा समूहाचे निमंत्रक भूषण कटककर, शाम खामकर, डॉ. दिपील पांढरपट्टे मंचावर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे संमेलन आयोजित करण्यात आले होते. २५ पे...

कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णीजयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

Image
कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन   पुणे : कविता म्हणजे जीवनाच्या अनुभूतीतून आलेला जाणिवांचा उद्गार, अंतरात्म्याचा हुंकार असते. s कविता म्हणजे कवीने स्वत:चा घेतलेला शोध असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले. कवयित्री जयश्री विजय श्रोत्रिय यांच्या ‘मनाचं आभाळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, विजय श्रोत्रिय, अनिरुद्ध श्रोत्रिय व्यासपीठावर होते. साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने टिळक रोडवरील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवेदना प्रकाशनने कविता संग्रह प्रकाशित केला आहे. अंजली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा, अनुभवांचा परीघ असतो. हा परीघ किती खोल असतो त्यानुसार कविता फुलतात. ढोबळपणे स्त्री कवयित्रींच्या बाबतीत तिचे जगणे, अनुभव कवितेत प्रतिबिं...