स्मार्ट मोबिलिटीमध्ये सायबर सुरक्षा हे एक आव्हान
स्मार्ट मोबिलिटीमध्ये सायबर सुरक्षा हे एक आव्हान पुणे, दि. ३ फेब्रुवारी, २०२६ : वाहनउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चर्चे दरम्यान सायबर सुरक्षा हे स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन च्या विकासातील प्रमुख आव्हानांपैकी एक आव्हान असल्याचे समोर आले असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. एआरएआय च्या वतीने नुकतेच मोशी येथील पीआयईसीसी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 'सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ अर्थात एसआयएटी २०२६ च्या समारोप समारंभावेळी डॉ. मथाई बोलत होते. समारोपप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी एसआयएटी २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी एआरएआयचे कौतुक केले. याबरोबरच भारत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सुरक्षित, स्वच्छ आणि हरित गतिशीलतेच्या महत्त्वावर वर्मा यांनी भर दिला. त्यांनी प्रमुख राष्ट्रीय उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी प्रमाणन, संशोधन आणि तंत्रज्ञान सक्षमीकरणामध्ये एआरएआयच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखलही घेतली. यावेळी हिरो मोटोकॉर्प...