_सुराज्य अभियान’च्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल_**उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी 'कार्य कृती अहवाल' सादर करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश*
दिनांक : 28.02.2026 *‘ _सुराज्य अभियान’च्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल_* *उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी 'कार्य कृती अहवाल' सादर करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश* सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील भीषण जलप्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) गंभीर दखल घेतली आहे. ‘सुराज्य अभियान’ने यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील दोन आठवड्यांत ‘कार्य कृती अहवाल’ (ATR) सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाचे सदस्य श्री. प्रियंक कानुनगो यांनी दिले आहेत. सुराज्य अभियानने आयोगासमोर मांडलेल्या पुराव्यानुसार, उजनीच्या पाण्यात मॅंगनीजची पातळी २.५६ mg/L आढळली आहे, जी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल ५१ पटीने जास्त आहे. पुणे आणि सोलापूर शहरांतून दररोज सुमारे ४,२६२ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याची धक्कादायक कबुली खुद्द...