देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान - जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार
*देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान - जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार* *राजीव गांधी स्मारक समिती तर्फे “भारतरत्न राजीव गांधी” स्मृती अभिवादन कार्यक्रम संपन्न..!* *‘पंतप्रधान पदाची उंची व देशाची प्रतिष्ठा’ भारतरत्न राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात स्व कर्तृत्वाने वाढवली - गोपाळदादा तिवारी* पुणे दि २१ मे - स्वातंत्र्योत्तर भारतात पं. नेहरू, शास्त्रीजी, इंदीराजीं पासून आलेला आधुनिकतेचा व तंत्रज्ञानाचा वसा आणि वारसा राजीव गांधींनी तसाच पुढे नेला. महात्मा गांधी, सरदार पटेलांच्या ‘स्वातंत्र्य लढ्याचा’ मुळ हेतू हा देशाचे ऐक्य, अखंडता, एकात्मता, समता, मानवता, सार्वभौमत्व व लोकशाही तत्वांची बूज प्रस्थापित करणे व देशातील शेवटच्या माणसाचा सर्वांगीण विकास हाच होता. यासाठी इंदिराजी, राजीवजी गांधी यांनी प्रसंगी प्राणांची आहुती दिली हे गांधी कुटुबियांचे योगदान न विसरण्याजोगे आहे असे उद्गार काँग्रेस चे जेष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी भारतरत्न दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीं यांना अभिवादनपर कार्यक्रमात केले. कात्रज येथील प्राणी संग्रहालया समोरील राजीव गांधी याचे प्रतिम...