Posts

वानवडी येथे श्री सोमनाथ मंदिरामध्ये वासंतिक उटी भजन कार्यक्रम संपन्न

Image
 वानवडी येथे श्री सोमनाथ मंदिरामध्ये  वासंतिक उटी भजन कार्यक्रम संपन्न वानवडी येथील जांभुळकर मळा मधील   श्री सोमनाथ सेवा ट्रस्ट व मनाजीराव गवळी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने श्री सोमनाथ मंदिरामध्ये वासंतिक उटी भजन.कीर्तन.व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. वानवडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी श्री सोमनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सचिन जांभुळकर, मनाजीराव गवळी सेवा प्रतिष्ठानचे सचिव जिगर गवळी, राहुल गवळी, बाळासाहेब गवळी, तुकाराम जांभुळकर, अनिल गवळी, अरुण भुजबळ, केरबा केदारी, सुरेश होले, कुंडलिक शेवते, महिला भजनी मंडळ प्रमुख विद्याताई भुजबळ, रजनी शेवते, यांच्यासह वानवडी महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती**- ‘रथ भीमाचा हा पुढे नेऊ’ कार्यक्रमातून गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कलाकारांची मानवंदना*

Image
*गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती* *- ‘रथ भीमाचा हा पुढे नेऊ’ कार्यक्रमातून गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कलाकारांची मानवंदना* पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती’तर्फे आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ कार्यक्रमात गझल व गीतांच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. पुणे विद्यापीठातील तथागत गौतम बुद्ध विहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “वंदितो तुला मी गौतमा”, “मुक्ती दिन हा मानवतेचा”, “सांगा बहुजनास आता संपला वनवास”, “चंदन वृक्ष समान होता भीमराव” अशा गीतांमधून कलाकारांनी महामानवांच्या कार्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा सुरेल आविष्कार सादर केला. ज्येष्ठ गझल गायक अशोक गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गीत-गझलांच्या माध्यमातून बुद्धांच्या करुणा व आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात “तथागत तुझा धम्म आचरणी” या गीताने झाली. त्यानंतर “हृदयी वसे माझ्या बुद्ध पिंपळाचा पार”, “भीमा तुझ्या कृपेने जगणे झाले सोपे”,...

बोथट, दिशाहीन समजाला कवीने भावनिकदृष्ट्या सक्षम करावे : भारत सासणेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुजित कदम यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव

Image
बोथट, दिशाहीन समजाला कवीने भावनिकदृष्ट्या सक्षम करावे : भारत सासणे रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुजित कदम यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव पुणे : आज भोवतालचा समाज संवेदनाहीन, बोथट झालेला असून समाजात नवतुच्छतावाद निर्माण होत आहे. आंधळ्यांची यात्रा असणाऱ्या दिशाहीन समाजाला संवेदनशील, सजग करणे, रसिकातील रसिकत्व जपून ठेवत समाज भावनिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य कवींकडून होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली. कवीकडे धीर धरण्याची वृत्ती हवी, ज्यातून कवीच्या मनातील मानकाचा प्रकाश समाजावर पसरत जाईल, असेही त्यांनी नमूद केले. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कवी सुजित कदम यांचा रविवारी (दि. ३) काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न संपणाऱ्या प्रवासाचा यात्री म्हण...

समस्त ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन सोहळा

Image
समस्त ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन सोहळा पुणे : समस्त ब्राह्मण संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकारेश्वर मंदिर येथे आज सामूहिक उपनयन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण ३० बटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या वर्षी ३ मुलींचाही समावेश करण्यात आला. हिंदू धर्मपरंपरेनुसार उपनयन हा १६ संस्कारांपैकी अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेला पुढे नेत, सर्व जाती व घटकांतील मुला-मुलींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या सामूहिक सोहळ्यातून करण्यात आला. या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा संकल्प सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सर्वसमावेशक व प्रगत विचारांना अनुसरून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सचिन टापरे, विजय पाठक, तेजस पाठक, रीमा कुलकर्णी, स्वाती पाठक, प्रज्ञा कापरे, अभय देशपांडे, हेमंत ढवळे, सुनील शिरगावकर आणि विराज जोशी यांचे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान लाभले.

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
*पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”* *महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार* पुणे, दि. २ मे २०२६ : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान कुटुंबीयांचे दुःख पाहून डॉ. गोऱ्हे भावूक झाल्या. “आईच्या हंबरड्याने मन हेलावलं. या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे त्यांनी सांगितले. कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याने कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न करता शांततेत संवाद साधल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून,...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईशप्रेम निकेतन आश्रमामध्ये अन्नदान

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईशप्रेम निकेतन आश्रमामध्ये अन्नदान  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाना पेठेतील पदमजी पार्क मधील ईश प्रेम निकेतन या अनाथ आश्रमामधील वृद्ध महिला आणि मुलींना अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी यांनी केले होते. यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, शितल मदने, अर्चना वाघमारे, रीना अडागळे, इस्तियाक बागवान, दीपक म्हस्के, आनंद वाघमारे, उमेश परदेशी, प्रेम परदेशी, कबीर परदेशी, महेश गुंडाले, आदी उपस्थित होते.

सुर-संगीताने रंगली ‘बुद्ध धम्म संध्या’*

Image
*सुर-संगीताने रंगली ‘बुद्ध धम्म संध्या’* *‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरेल गीतांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगला. “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि”, “माझा भीमराया”, “प्रथम नमो गौतमा”, “सोनियाची उगवली सकाळ”, “भीमा तुला प्रणाम कोटी कोटी”, “जरी झाला बॅरिस्टर”, “आकाश मोजतो आम्ही” अशा गीतांद्वारे तथागत गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या विचारांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक आणि वादकांनी बुद्ध व आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारी गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आयोजक, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्ष...