स्वराज ट्रॅक्टर्स आणि महिंद्रा सस्टेन यांच्याकडून पंजाबमध्ये सर्वात मोठा ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्प कार्यान्वित
स्वराज ट्रॅक्टर्स आणि महिंद्रा सस्टेन यांच्याकडून पंजाबमध्ये सर्वात मोठा ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्प कार्यान्वित
४२ एमडब्ल्यूपीचा हा प्रकल्प स्वराज ट्रॅक्टर्सच्या उत्पादन युनिट्स विजेच्या सुमारे ५० टक्के गरजा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
प्रकल्पाची सुरुवात डीकार्बोनायझेशन, नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार आणि शाश्वत उत्पादनासाठीच्या स्वराजच्या दीर्घकालीन रोडमॅपमधील एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय, सप्टेंबर २, २०२६: महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्स आणि ग्रुपचा नवीकरणीय ऊर्जा प्लॅटफॉर्म व इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर महिंद्रा सस्टेनने आज बठिंडा, पंजाब येथे ४२ एमडब्ल्यूपी ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याची घोषणा केली. हा प्रकल्प राज्यातील आपल्या प्रकारच्या सर्वात मोठ्या ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्पांपैकी एक आहे.
हा प्रकल्प स्वराज ट्रॅक्टर्सच्या उत्पादन युनिट्सच्या विजेच्या गरजांपैकी सुमारे ५० टक्के गरजा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे महिंद्रा ग्रुपच्या शाश्वततेच्या कटिबद्धतेनुसार भविष्यासाठी सज्ज, कमी-कार्बन उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या कंपनीच्या व्यापक धोरणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
महिंद्रा सस्टेनद्वारे विकसित आणि कार्यान्वित केलेला ४२ एमडब्ल्यूपीचा हा सौर प्रकल्प मोहाली, पंजाब येथील स्वराज ट्रॅक्टर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली आणि फाऊंड्री ऑपरेशन्सना नवीकरणीय वीज पुरवेल. सुमारे १४१ एकरवर पसरलेल्या या प्रकल्पात फिक्स्ड-टिल्ट स्ट्रक्चर्सवर बसवलेले उच्च-कार्यक्षमतेचे एन-टाइप टॉपकॉन बायफेशिअल सोलर मॉड्यूल्स समाविष्ट आहेत. प्रकल्पाची उर्वरित क्षमता पंजाबमध्ये असलेल्या महिंद्रा ग्रुपच्या इतर घटकांच्या वीज वापराला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित होण्याबाबत मत व्यक्त करत महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या स्वराज डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गगनजोत सिंग म्हणाले, "जवळपास अर्ध्या शतकापूर्वी स्वराजची स्थापना स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांवर झाली होती. भारत ज्या वेळी जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करत आहे आणि देशवासीयांसाठी अधिक हरित पर्यावरणाच्या दिशेने पावले टाकत आहे, अशा वेळी द्विसूत्री धोरणाद्वारे योगदान देण्याचा स्वराजला अभिमान वाटतो: ऊर्जा वापर कमी करणे आणि टप्प्याटप्प्याने पारंपारिक स्रोतांच्या जागी नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणे.
या वर्षाच्या सुरुवातीला स्वराजला ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी गोल्डन पीकॉक अवॉर्ड फॉर एनर्जी एफिशिएन्सीने सन्मानित करण्यात आले होते. बठिंडा, पंजाब येथे अत्याधुनिक सौर प्रकल्प विकसित करणाऱ्या महिंद्रा सस्टेनसोबत सहयोगामुळे हे शक्य झाले आहे. आता आम्ही आमच्या निम्म्याहून अधिक ऊर्जेच्या गरजा नवीकरणीय स्रोतांमधून पूर्ण करून आमच्या ऊर्जा-कार्यक्षमता उपक्रमांना अधिक दृढता देत आहोत. हा प्रकल्प आमचे ऊर्जा स्वावलंबन अधिक दृढ करतो, महिंद्रा ग्रुपच्या प्लॅनेट पॉझिटिव्ह बनण्याच्या ध्येयात योगदान देतो आणि ‘टूगेदर वी राईज फॉर अ मोअर इक्वल, मोअर सस्टेनेबल वर्ल्ड' हे आमचे व्हिजन पुढे नेतो."
टप्पा आहेस्वराजचा शाश्वततेचा प्रवास केवळ नवीकरणीय ऊर्जेच्या स्वीकारापुरता मर्यादित नाही. २०२३ मध्ये, सर्व स्वराज ट्रॅक्टर उत्पादन प्लांट्सनी ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यासाठी EP100 प्रमाणपत्र प्राप्त केले, जे महिंद्रा ग्रुपच्या कटिबद्धतेच्या वेळेपेक्षा सात वर्षे आधीच पूर्ण झाले आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत महिंद्रा सस्टेनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. अविनाश राव म्हणाले, "स्वराज ट्रॅक्टर्सच्या नवीकरणीय ऊर्जा परिवर्तन आणि शाश्वतता अजेंड्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या प्रकल्पाची सुरुवात महिंद्रा सस्टेनच्या ग्रुप कॅप्टिव्ह रचनेद्वारे व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठ्यातील पहिल्याच पावलाचे प्रतिनिधित्व करते, जे सरकारी युटिलिटीजला वीज पुरवण्याच्या आमच्या पारंपारिक मॉडेलला पूरक ठरते.
प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या वेळी पंजाबमधील सर्वात मोठ्या ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प दरवर्षी ४२,००० टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा प्रभाव कमी करेल, अशी अपेक्षा आहे."
Comments
Post a Comment