सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*



*सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*

*आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे*

पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर मात करण्यासाठी भौतिक उपायांपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान आवश्यक आहे. समाजाला दिशा देण्यासाठी आणि ‘रामराज्य’ स्थापनेसाठी साधनेला पर्याय नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. चिंचवड येथील 'जी. एम. के. बँक्वेट्स अँड लॉन्स' येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीने यंदा विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर पुणे जिल्ह्यात चिंचवडसह तळेगाव, कोथरूड, हडपसर, जुन्नर, सातारा रस्ता, भोर, सिंहगड रस्ता अशा एकूण ८ ठिकाणी हा महोत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाचा लाभ ४००० हून अधिक भाविकांनी घेतला.

*हिंदुत्वाचे कार्य करणारा कार्यकर्ता कसा असावा, याचा आदर्शच सनातनच्या साधकांनी आपल्या आचरणातून घालून दिला आहे*. - *श्री. सर्वेश मेहेंदळे, सामाजिक विश्लेषक*

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये काम करताना कार्यकर्त्यांचा 'अहंकार' ही मोठी समस्या जाणवते. याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांमधील सात्त्विक तेज व अद्वितीय विनम्रता पाहून मन भारावून जाते. साधकांच्या या दैवी नम्रतेतूनच मला प्रेरणा मिळते आणि 'देव, देश अन् धर्म' रक्षणासाठी अविरत कार्य करण्याची आध्यात्मिक शक्ती मिळते असे मत सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी या वेळी चिंचवड (रावेत ) येथे व्यक्त केले. 

आजच्या काळात देशविघातक आणि विभाजनवादी शक्तींचा बीमोड केल्याशिवाय 'रामराज्य' किंवा 'ईश्वरी राज्य' प्रस्थापित होऊ शकत नाही असे परखड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री.सात्यकी सावरकर यांनी श्रुती मंगल कार्यालयात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री.पराग गोखले आणि श्री. नागेश जोशी, श्री. दीपक आगवणे, कु. क्रांती पेटकर, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, सौ. ज्योती दाते, डॉ.ज्योती काळे, श्री. केतन पाटील यांनीही उपस्थिताना संबोधित केले. 

*पुस्तक प्रकाशन !*
डेक्कन जिमखाना, पुणे येथील 'श्रुति मंगल कार्यालया'त 'स्वभावदोष निर्मूलन आणि गुणवृद्धी' आणि 'प्रार्थना' या २ इबुकचे प्रकाशन सात्यकी सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे आणि श्री चैतन्य तागडे यांच्या हस्ते 'सच्चिदानंद परब्रम्ह डॉ.जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.


*विविध उपक्रम आणि आवाहन !*
महोत्सवात व्यासपूजन, गुरुपूजन, लघुपट दर्शन, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, धर्मरक्षकांचा सत्कार आणि 'रामराज्य' स्थापनेचा संकल्प करण्यात आला. आगामी भीषण आपत्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता, सर्व हिंदूंनी प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच देश-विदेशातील हजारो भाविकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून महोत्सवाचा लाभ घेतला. 


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न