अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी स्पर्धा संपन्न...रांगोळीच्या माध्यमातून देशाचा मान वाढवूयाचा दिला नारा...!
*अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी स्पर्धा संपन्न...रांगोळीच्या माध्यमातून देशाचा मान वाढवूयाचा दिला नारा...!*
शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी अरण्येश्वर एकता मित्र मंडळामध्ये सकाळी ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर रंगांमधून देशभक्ती व्यक्त करण्यासाठी मंडळातील लहान बाळ युवा विद्यार्थ्यांसाठी ' विशेष रांगोळी स्पर्धा' आयोजित करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांच्या सुप्त कलागुनांना वाव देण्यासाठी या आकर्षक 'रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्याचा हेतू यशस्वी झाला.
यात मुलांनी तिरंगा, अशोक चक्र व भारताच्या वेगवेगळ्या देशभक्तीपर प्रतिमा रांगोळीतून साकारल्या. ही स्पर्धा कला आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर सोहळा होता. या स्पर्धेचे आयोजन अंगणवाडी सेविका शैलाताई मारणे व मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मांढरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. या स्पर्धेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले कार्यकर्ते चैतन्य ढमाले, संकेत आढाव यांचे सहकार्य लाभले. मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश खंडागळे व अनिल ढमाले यांच्या हस्ते बक्षीस वितरण सभारंभ संपन्न झाला.
Comments
Post a Comment