संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन*

*संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन*

पुणे :  भारतीय संविधान आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा अवमान करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात पुणे शहर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी कॉँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष कुणाल राजगुरू, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, संग्राम रोहम आदि मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर असलेले वरिष्ठ संसदीय सभागृहाचे सदस्य व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८ ऑगस्ट २०२६ रोजी विजय शंखनाद रॅलीच्या कार्यक्रमासाठी उत्तराखंड मधील हलदानी येथील  रामलीला मैदानावर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जातीयवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी गोमूत्र शिंपडून मैदान पवित्र केल्याचा दावा केला आहे, ही कृती म्हणजे केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचाच नव्हे तर भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे समितीने म्हटले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*