रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य देशहिताचे : डॉ. उदय कुलकर्णीद्वितीय वर्धापन दिनानिमित्त 'गोष्ट इथे संपत नाही' कथाकथन कार्यक्रम

रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य देशहिताचे : डॉ. उदय कुलकर्णी

द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 'गोष्ट इथे संपत नाही' कथाकथन कार्यक्रम

 

पुणे : समाजमाध्यमातून एकत्र येऊन निर्मित झालेल्या राबसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे देव, देश आणि धर्माला केंद्रस्थानी मानून सुरू असलेले कार्य महनीय असून देशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलू शकेल, असे गौरवोद्‌गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, नौदलात सेवा बजाविलेले ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. उदय कुलकर्णी यांनी काढले.

डिजिटल विश्वातील ‘रावसाहेब कट्टा’ या व्यासपीठावरून एकत्र येत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या 'रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट'चा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शनिवारी साजरा झाला. त्या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद जोशी, संस्थापक सदस्य रोहित कुलकर्णी मंचावर होते.

सुरुवातीस सचिव प्रसाद ठोसर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, ट्रस्टने दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून राज्यातील सुमारे १० शाळांना सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत 'दिवाळी फराळ' उपक्रम राबवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्राचीन मंदिरांचे पुनरुज्जीवन करून सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी ट्रस्टने विशेष पुढाकार घेतला आहे. महिला पोलिस, शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कार्याचीही माहिती दिली.

डॉ. उदय कुलकर्णी पुढे म्हणाले, धर्म, नितिमत्ता, आध्यात्मिकता रुजवत असतानाच देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सेनेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रावसाहेब ट्रस्टमार्फत होणारे कार्य स्पृहणीय आहे. समाज माध्यमांचा सकारात्मक उपयोग करून समाजोपयोगी कार्य कसे करता येते हे रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अफजलखानच्या वधावर आधारित 'गोष्ट इथे संपत नाही' हा बहुचर्चित कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांनी उत्तम संवादकौशल्य आणि प्रभावी सादरीकरणातून इतिहासातील नकाशे, सनावळी आणि तपशीलांसह कथा उलगडत नेली. त्याला रसिकांची भरभरून प्रतिसाद दिला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पितळे यांनी कले तर आभार चैताली फडके यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य