‘टू सेंटस’ परिवर्तनाचे एक सखोल चिंतनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भावनाः लेखिका बगसारवाला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन



‘टू सेंटस’ परिवर्तनाचे एक सखोल चिंतन
मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भावनाः लेखिका बगसारवाला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. १८ मार्च : " टू सेंट्स ही एक गहन आणि शांत कलाकृती आहे. अनुभव, जबाबदारी आणि आंतरिक जागृतीच्या माध्यमातून स्त्रीच्या जीवनाबद्दलची विकसीत होणार्‍या गोष्टीचा मागोवा घेेते. काळानुसार स्मृती, अर्थामध्ये होणारे बदल आणि जीवनातील विरोधाभासाचे अनेक सत्ये कशी समावली जाऊ शकतात याचे एक रुपक आहे.” अशी भावना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
लेखिका अलेफिया बगसारवाला यांनी लिहिलेल्या ‘टू सेंट्सः नोट्स ऑफ अ यंग विडो’ या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. तसेच
अजिंक्य डी.वाय.पाटील ग्रुप चे कुलपती डॉ अजिंक्य डी.वाय.पाटील यांनी पुस्तका बद्दल विशेष संदेश दिला आहे.
 या प्रसंगी लेखिका अलेफिया बागसरवाला यांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानानंतर लेखिका अलेफिया बगसारवाल म्हणाल्या की," वैयक्तिक अनुभव आणि समाजिक समस्या दर्शवणार्‍या कथा लिहित राहण्यास आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळते. हे पुस्तक जीवनप्रवास उलगडते. यात प्रेम, मनःशांती आणि वैधव्य सारख्या विषयांचा शोध घेतला आहे. अत्तर आणि कवितेच्या माध्यमातून सांगितलेला हा प्रवास भारतीय विधवांची स्थिती आणि परिस्थिती याबद्दलच्या एक महत्वाच्या सामाजिक संदेशालाही स्पर्श करते.” 
लेखिकाने आपल्या पतीच्या निधनानंतर टू सेंट्स पुस्तक लिहिले. यात भावना व आठवणींचा संग्रह आहे. हा वैयक्तिक वृत्तांत नसून परिवर्तनावरील सखोल चिंतन आहे. स्त्रीने भूतकाळाशी सन्मानाने सामना कसा करावा, वर्तमानकाळ स्पष्टतेने कसे जगावे आणि नव्याने नियंत्रण मिळवून भविष्यात कसे पाऊल टाकावे याचा शोध घेते. हे पुस्तक वाचकांना चिंतन करायला व समजून घ्यायला प्रवृत्त करते. 
हे आत्मचरित्र भावनिक उपचाराची अभिव्यक्ती म्हणून कथाकथन, कविता आणि प्रतिकात्मक उपहासाचा मिलाफ साधते. एखाद्या सुगंधाप्रमाणे रचलेल्या या पुस्तकात एक उपसंहारही आहे. भारतातील विविध ऐतिहासिक कालखंडांतील विधवांच्या सामाजिक स्थितीचे थोडक्यात विश्लेषण करते.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांनी प्रेरणादायी संदेश दिला आहे. तसेच डॉ. फिरोज पूनावाल, उमेश फरवानी, ऐमान मेहता, राबिया पटेल, अर्चना जैन, डॉ. मिकी मेहता आणि रिधिमा तिवारी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनी पाठिंबा दर्शविला आहे.


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य