महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीला कामगार नेते व आमदार भाई जगताप, कामगार नेते सुनील शिंदे, अविनाश अधिक, राजेंद्र होनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त डॉ H P तुमोड व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा, त्याचबरोबर राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, ज्या साखर कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीने केलेला करार व त्याप्रमाणे वेतन वाढ दिलेली नाही, अशा कारखानदारांना क्रशिंगचे लायसन देऊ नये, काही कारखान्यांनी कामगारांची देणे देण्यासाठी सरकारकडून त्याबरोबर काही बँकांकडून कर्ज घेतले आहे परंतु कामगारांची तिकीट देणे दिलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागण्या करण्यात आल्या. त्यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती घटित करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

Comments

Popular posts from this blog

भारतरत्न सचिन तेंडूलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडरचितळे बंधू मिठाईवाले यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा