Posts

कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे**-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत

Image
*कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे* *-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत* पुणे : कलाकार म्हणून काम करत असताना आपल्यातील संवेदना कायम जागरूक ठेवल्या पाहिजे . आपण समाजाकडे संवेदनशील नजरेने पाहिले तर आपल्यातील कला अधिक बहरत जाते . समाजाचे केवळ मनोरंजन न करता समाजाला जागृत ठेवून समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रश्न मांडून त्यांचा आवाज बनण्याचे काम कलाकाराने केले पाहिजे, असे आवाहन चित्रकला नाट्य आधी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांनी केले. करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या उरगेन आर्ट फेस्टिवल फेस्टिवल मध्ये कलाकार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ,त्यावेळी जेष्ठ कलाकारांनी कलाकार आणि समाजाप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना व्यक्त केला. ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ चित्रकार मोगलान श्रावस्ती ,ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजय जीवने आधी या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. सुधारक ओलवे म्हणाले, पत्रकार म्हणून काम करत असताना माझी परिस्थिती अत्यंत गरी...

ढोल-ताशा वादकांच्या हाती आता जीवनरक्षणाचे कौशल्य ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशन यांच्या वतीने पथकातील वादकांसाठी सीपीआरचे प्रशिक्षण

Image
ढोल-ताशा वादकांच्या हाती आता जीवनरक्षणाचे कौशल्य  ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशन यांच्या वतीने पथकातील वादकांसाठी सीपीआरचे प्रशिक्षण पुणे : गणेशोत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशाच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचे जतन करणाऱ्या पथकांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या तरुणांना आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले जीवनरक्षक कौशल्य अवगत असणे उपयुक्त ठरणार आहे. अचानक हृदयक्रिया बंद पडणे, बेशुद्ध होणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ निर्णायक ठरू शकतो. अशा वेळी तातडीने सीपीआर देता यावा आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करता यावेत, या उद्देशाने ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशन यांच्या वतीने पथकातील वादकांसाठी सीपीआर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिका येथे हे शिबिर झाले. यावेळी मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, सेव...

दिव्यांग जवानांच्या मनगटावर बांधली कृतज्ञतेची राखी*सैनिक मित्र परिवारातर्फे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा; तीनशेपेक्षा अधिक जवानांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

Image
*दिव्यांग जवानांच्या मनगटावर बांधली कृतज्ञतेची राखी* सैनिक मित्र परिवारातर्फे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा; तीनशेपेक्षा अधिक जवानांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण पुणे : रणांगणातील संघर्ष संपला असला, तरी देशासाठी दिलेल्या त्यागाच्या खुणा या जवानांच्या शरीरावर कायम आहेत. त्या खुणांकडे केवळ दिव्यांगत्व म्हणून न पाहता त्यांच्या शौर्याची ओळख म्हणून पाहण्याचा संदेश देत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तीनशेपेक्षा अधिक जवानांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली. पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर आणि क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये हा स्नेह सोहळा पार पडला. सैनिक मित्र परिवारातर्फे आयोजित या उपक्रमातून जवानांच्या त्यागाला समाजाच्या कृतज्ञतेची ऊब मिळाली. यावेळी सीमा शिंदे, कल्याणी सराफ, उमा ताटके, मंजुळा भालिया, राखी कोकाटे, सारिका गायकवाड आणि सुवर्णा कुलाल उपस्थित होत्या. त्यांनी जवानांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम केला. विश्वेश्वर सहकारी बँक, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, आर्ट ऑफ लिव्हिंग, लव्ह केअर शेअर फाऊंडेशन मधील पंचवीस पेक्षा अधिक भगिनींचा सहभाग देखील होता.  रक्षाबंधनाच...

कामगारहितासाठी भारतीय मजदूर संघाचा ठाम आवाज -केंद्रीय कामगार मंत्र्यांकडून सुधारणा करण्याचे आश्वासन

Image
*कामगारहितासाठी भारतीय मजदूर संघाचा ठाम आवाज -केंद्रीय कामगार मंत्र्यांकडून सुधारणा करण्याचे आश्वासन* पुणे दि. २ सप्टेंबर ( प्रतिनिधी) नवीन कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदी, सामाजिक सुरक्षा आणि रोजगार संरक्षणासंदर्भात भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. भारतीय मजदूर संघाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील,असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय शिष्टमंडळाने नवीन कामगार संहितांमधील विविध तरतुदींबाबत आपल्या हरकती व मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. शिष्टमंडळात अखिल भारतीय अध्यक्ष एस. मल्लेशम,अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र कुमार पांडेय,अखिल भारतीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन,माजी अखिल भारतीय अध्यक्ष हिरण्य पांड्या आणि संजी नारायण यांचा समावेश होता. बैठकीत सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार करण्यासाठ...

मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार - २०२६आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक प्रा. विलास कथुरे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Image
मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार - २०२६ आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक प्रा. विलास कथुरे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पुणे, दि. २ सप्टेंबर: कुस्ती खेळासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागातील असिस्टंट डायरेक्टर प्रा. विलास कथुरे यांना नुकताच मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार - २०२६ ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी लिजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती, दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड व कालीरमन फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे हा सन्मान हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल, कराड) येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्...

आपल्या संततितून अर्जुन घडावेत’ या विषयावरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन*

Image
----- *‘आपल्या संततितून अर्जुन घडावेत’ या विषयावरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन* पुणे, दि. २ - ‘घराघरातील तिसरी संतति (किंवा एक संतति)अर्जुन घडविण्यासाठी’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम् न्यासाच्या वतीने आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा संस्कृतसह सर्व भारतीय भाषांमधून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस), सुदर्शन टीव्ही. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व नागरी लिपी परिषदेच्या सहकार्याने ही निबंध स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती मुख्य संयोजिका माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे व एमईएसच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी आज येथे दिली. गेल्यावर्षी ‘आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या विषयावरील निबंध स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला होता. बारावीपर्यंतचे शालेय विद्यार्थी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्व नागरीक अशा तीन श्रेणींमध्य़े ही निबंध स्पर्धा होणार असून www.kyps.in या वेबपोर्टलवर नोंदणी करुन दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निबंध अपलोड करावयाचे आहेत. ‘घराघरातील तिसरी संतति अर्जुन घडविण्या...

शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडीचा, अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने सोडवा: आप ची मागणी*

Image
*शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडीचा, अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने सोडवा: आप ची मागणी* शिवाजीनगर भागात गणेश खिंड रोड, जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड , सेनापती बापट रोड , जुना मुंबई महामार्ग आदी महत्त्वाचे रस्ते असून या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील पदपथावरील अतिक्रमणे तातडीने दूर करावीत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने शिवाजीनगर सहाय्यक आयुक्त ढवळे यांची काल /३१ ऑगस्ट रोजी भेट घेऊन केली. अनाधिकृतपणे वाढत चाललेल्या खाऊगल्ली आणि या भागातील वृक्षतोडीबाबतही अनेक तक्रारींचा पाढा मांडण्यात आला. गणेश खिंड रोड ची रुंदी विकास आराखड्याप्रमाणे मेट्रो ने विचारात न घेतल्यामुळे झालेल्या अडचणी तसेच वाकडेवाडी भुयारी मार्ग संदर्भातील चर्चा झाली.  यावेळेस शिवाजीनगर भागातील आम आदमी पार्टी चे शंकर थोरात यांच्यासह मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे,संतोष काळे,शितल कांडेलकर,माधुरी गायकवाड, निरंजन अडागळे,राजेंद्र प्रसाद निसाद,श्रीकांत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.