Posts

*विविध धर्मीयांच्या मतांवर तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्यांनी संविधानिक धर्मनिरपेक्षपतेवर आक्षेप घ्यावा ही कृतघ्नतेची मानसिकता का न्यूनगंडाचे लक्षण ?**कॉंग्रेसचा तिखट सवाल

*विविध धर्मीयांच्या मतांवर तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्यांनी संविधानिक धर्मनिरपेक्षपतेवर आक्षेप घ्यावा ही कृतघ्नतेची मानसिकता का न्यूनगंडाचे लक्षण ?* *कॉंग्रेसचा तिखट सवाल* पुणे :  -- भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह दत्ता होसबाळे यांनी नुकतेच संविधानातील समाजवाद व धर्मनिरपेक्षता शब्दां बद्दल हरकती नोंदविणारे विधान केले त्याचा निषेध नोंदविताना कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले की देशात विविध धर्मियांची मते लक्षात घेवून तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्यांनी समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दावर आक्षेप घ्यावा हे देशातील, हिंदू सोडून बौद्ध, जैन‌, ख्रिश्चन‌, मुस्लिम, बोहरा, शीख इ धर्मिय नागरिकांचे प्रती कृतध्नता दर्शविणाऱ्या मनोवृत्तीचे दर्शन असून केवळ हिंदूचाच विचार करणारी मानसिकता न्यूनगंड दर्शवणारी व संविधानीक कर्तव्यांपासून पलायन करणारी असल्याची टीका केली. देशातील ‘विविध धर्मियांना’ जे आपले मानत नाहीत, त्यांचे प्रती आस्था बाळगत नाहीत व त्यांना न्याय देण्याची भूमिका घेवू शकत नाहीत ते मात्र विश्वगुरू होण्याची स्वप्ने पाहतात, हे‌ हास्यापद‌ आहे ....

अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफच्या आयपीक्यू ७.० मध्ये ग्रामीण भारतातील वाढती जागरूकता परंतु संरक्षणातील सातत्यपूर्ण तफावतीकडे निर्देशप्रमुख निष्कर्ष:

अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफच्या आयपीक्यू ७.० मध्ये ग्रामीण भारतातील वाढती जागरूकता परंतु संरक्षणातील सातत्यपूर्ण तफावतीकडे निर्देश प्रमुख निष्कर्ष: • ग्रामीण भारतातील संरक्षण गुणांक वाढून १६ वर पोहोचला. तो आयपीक्यू ५.० मध्ये १२ होता - परंतु शहरी-ग्रामीण तफावत ३२ अंकांवर आहे • जीवनविम्याबाबत जागरूकता वाढूनही अंगीकार लक्षणीयरीत्या कमी आहे • ग्रामीण महिला सर्व संरक्षण निर्देशांकांमध्ये ग्रामीण पुरुषांपेक्षा मागे आहेत - संरक्षण गुणांक १४ विरुद्ध १७ • पश्चिम विभागात ग्रामीण संरक्षण निर्देशांक जास्त असून; बचत योजनेत फक्त २% मालकीसह पूर्व विभागात सर्वांत कमी आहे. • ४३% लोकांच्या मते जीवन विम्याचा फायदा केवळ कुटुंबाला होतो, व्यक्तीला नाही • डिजिटल वापर वाढला - आर्थिक व्यवहार दुप्पट झाले; ८८% लोक सोशल मीडियासाठी मोबाइल वापरतात नवी दिल्ली, 27 जून २०२५: अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड (“अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ” / “कंपनी”), पूर्वाश्रमीची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या प्रमुख सर्वेक्षण - इंडिया प्रोटेक्शन कोशंटच्या (आयपीक्यू) सातव्या आवृत्तीत ग्रामीण भारतातील निष्कर्षांचे प्रकाशन केले असून त...

जॉय एन क्रू तर्फे नॉर्दर्न लाईट्स च्या पर्यटनाची संधी

Image
*जॉय एन क्रू तर्फे नॉर्दर्न लाईट्स च्या पर्यटनाची संधी* पुणे, प्रतिनिधि - प्रकृतीच्या अद्भुत आणि भुरळ घालणाऱ्या चमत्कारांपैकी एक म्हणजे नॉर्दर्न लाईट्स (Aurora Borealis). या अद्वितीय दृश्याचा आनंद घेण्याची संधी आता जॉय एन क्रू या भारतातील प्रीमियम ट्रॅव्हल ब्रँड तर्फे पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. उबदार ग्लास इग्लू मध्ये झोपण्याचा अनुभव, स्नोमोबाईल आणि रेनडिअर स्लेज वरून ऑरोराचा पाठलाग, तसेच बर्फाळ समुद्रात आइसब्रेकर क्रूझ ही प्रवासाची वैशिष्ट्ये आहेत. जॉय एन क्रू सोबत ही स्वप्नवत आर्क्टिक सफरची टूर केवळ पाहण्याचीच नाही, तर जगण्याची एक अविस्मरणीय अनुभूती ठरणार आहे. ही संपूर्ण यात्रा आराम, लक्झरी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाने परिपूर्ण असून नॉर्वे, फिनलंड आणि आइसलँड या स्कँडिनेव्हियन देशांमध्ये जॉय एन क्रू कडून गट प्रवास तसेच व्यक्तिगत प्रवास यांचे पर्याय दिले जातात. प्रत्येक टूर ही फक्त पर्यटन न राहता, एक आयुष्यभराची आठवण बनावी असा उद्देश या ब्रँडचा असतो. "Your Joy, Our Crew" हे ब्रँडचे ब्रीदवाक्य असून त्यानुसार प्रत्येक ग्राहकासाठी व्हिसा सहाय्यता, उबदार थर्मल गिअर, तात्काळ मदत आणि ...

टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा*

Image
*टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा* *तळेगाव* - रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. यानिमत्ताने टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॅाक्टरांना गुलाबपुष्प तसेच भेटकार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित डॅाक्टरांसाठी याठिकाणी म्युझिक थेरपी सत्र, मनोरंजनात्मक खेळ आणि कराओके सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून डॅाक्टरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लूटला.

*गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा

Image
*गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा* दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.   *_हे मानव, हे मानव_* *_आदते अब बदल दो_* *_कुदरत के बवंडर का_* *_इशारा अब समझ लो_* असं म्हणत त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटातील प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं आहे. 'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देण्याचा ...

संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरुपात

Image
*‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरुपात* सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढी पुढे आणणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. हे नाटक कालसुसंगत आहे म्हणूनच याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याकरिता तिकीटदर ३०० /२००/१०० सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवण्यात आल्याचे रवींद्र माधव साठे यांनी सांगितले. हे नाटक नव्या पिढीतील तरूण सादर करत आहेत असेही साठे यांनी सांगितले.  नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते असून मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व द...

'दगडूशेठ' गणपती मंदिरात ६५ ब्रह्मवृंदांसह २१ दिवसांचा अतिरुद्र महायज्ञ* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग

Image
*'दगडूशेठ' गणपती मंदिरात ६५ ब्रह्मवृंदांसह २१ दिवसांचा अतिरुद्र महायज्ञ*  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग   पुणे : संपूर्ण विश्वात शांती व सद््भावना निर्मितीकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्यावतीने २१ दिवसांचा अतिरुद्र महायाग मंदिरात होणार आहे. यामध्ये तब्बल ६५ ब्रह्मवृंद सहभागी होणार असून दि. ५ ते २५ जुलै दरम्यान दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ यावेळेत हा महायाग होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.   अतिरुद्र यज्ञ ही केवळ पूजा नसून, एक आध्यात्मिक ऊर्जा प्रक्षेपण आहे. वेदांनुसार, या यज्ञामुळे व्यक्ती, कुटुंब व जग यांच्यात संतुलन व शुद्धता येते. हा यज्ञ जेथे होतो तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्यातील चेतनापेशी उर्जित होतात आणि कार्यमग्नता वाढते. एक लघुरुद्र म्हणजे ११ ब्रह्मवृंदांनी ११ वेळा रुद्रपठण करणे, असे ११ लघुरुद्र म्हणजे १ महारुद्र आणि ११ महारुद्र म्हणजे १ अतिरुद्र होय. अतिरुद्राच्या या मोठया व्यापकतेमुळे वायुमंडल श...