विरोधकां विषयी उपहासात्मक बोलण्यास बुद्धी लागत नाही…!*——- *मतदानाच्या सर्वसमान अधिकारासाठी मविआ’चा संघर्ष… ही संविधानीक कर्तव्यपूर्ती..! - काँग्रेस’ची फडणवीसांवर टीका*
*विरोधकां विषयी उपहासात्मक बोलण्यास बुद्धी लागत नाही…!* ——- *मतदानाच्या सर्वसमान अधिकारासाठी मविआ’चा संघर्ष… ही संविधानीक कर्तव्यपूर्ती..! - काँग्रेस’ची फडणवीसांवर टीका* पुणे दि - १७ आक्टो - ‘जनतेच्या मतांच्या मौलीक हक्का संबंघि’ मविआ’ शिष्टमंडळ निवडणुक आयोगास भेटल्याच्या पार्श्वभूमिवर निवडणुक आयोगाची चपलाशी करण्याच्या नादात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर उपहासक पध्दतीने वक्तव्ये करून विरोधी पक्ष नेत्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला निंद्य प्रयत्न ‘महाराष्ट्राच्या सुसंस्कृत नेतृत्वाच्या परंपरेला’ गालबोट लावणारा असल्याची प्रखर टीका प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. विरोधक हे सत्ताधारी पक्षाचे शत्रू नसुन, जनतेचा आवाज व आशास्थान आहे हे फडणवीसांना समजू नये काय (?) असा सवाल केला. वास्तविक पाहता, मविआ पक्षातील नेत्यांनी फडणवीसांच्या कालावधी पेक्षाही जास्त कालावधी जनतेच्या पाठींब्यावर, विरोधी पक्षांची तोडफोड न करता व मतचोरींच्या आरोपां शिवाय निर्वादातीत कालावधी वारंवार उ...