Posts

तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा यांना विजेतेपद

Image
तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा यांना विजेतेपद  पुणे, 1 मार्च 2026: 'द पूना क्लब लिमिडेट' यांच्या संकल्पनेतून दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एक्झिक्युट केलेल्या व सदर्न कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, दिनकर महाले, ज्योती गवते, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा, ज्योती ठाकरे , चिंतामण गायकवाड यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत 15000 हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. 21.1 किमी पुरुष 18 ते 30 वयोगटात राज तिवारीने 01.08.11सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, महिला गटात रविना गायकवाड हिने 01.27.45 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.  10 किमी 18 ते 30 महिला वयोगटात साक्षी भंडारी हिने सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. तर, पुरुष गटात सौरभ मेहराने 30.56 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळविले.    स्पर्धकांना 21.1 किमी साठी पुणे रेस कोर्स येथून सुरुवात होणार असून अरुण खेत्रपाल रोड, जिजामाता रोड, घोरप...

अवचित स्तब्धतेतच काव्य स्फूरते : भारत सासणेकरम प्रतिष्ठानतर्फे डॉ. माधुरी जोशी यांचा ‘करम - गझलांजली’ पुरस्कराने गौरव

Image
अवचित स्तब्धतेतच काव्य स्फूरते : भारत सासणे करम प्रतिष्ठानतर्फे डॉ. माधुरी जोशी यांचा ‘करम - गझलांजली’ पुरस्कराने गौरव   पुणे : अवकाश, स्तब्धता, विराम, संयम, चिंतन म्हणजे कविता. काव्याची निर्मिती हा दूरचा प्रवास असतो. अवचित स्तब्धतेतच काव्य स्फूरते. कवितेच्या मागे लागलात तर ती तुमच्यापासून दूर जाते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केले.   करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा डॉ. माधुरी चव्हाण-जोशी यांचा प्रतिष्ठेच्या ‘करम - गझलांजली’ पुरस्कराने आज (दि. १) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित आयोजित करण्यात आला होता.   सुरुवातीस करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी संस्थेच्या १० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती विशद केली.   यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते अ...

_सुराज्य अभियान’च्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल_**उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी 'कार्य कृती अहवाल' सादर करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश*

दिनांक : 28.02.2026 *‘ _सुराज्य अभियान’च्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल_* *उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी 'कार्य कृती अहवाल' सादर करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश* सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील भीषण जलप्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) गंभीर दखल घेतली आहे. ‘सुराज्य अभियान’ने यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील दोन आठवड्यांत ‘कार्य कृती अहवाल’ (ATR) सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाचे सदस्य श्री. प्रियंक कानुनगो यांनी दिले आहेत. सुराज्य अभियानने आयोगासमोर मांडलेल्या पुराव्यानुसार, उजनीच्या पाण्यात मॅंगनीजची पातळी २.५६ mg/L आढळली आहे, जी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल ५१ पटीने जास्त आहे. पुणे आणि सोलापूर शहरांतून दररोज सुमारे ४,२६२ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याची धक्कादायक कबुली खुद्द...

पेहेल-२०२६ अभियानाचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे उद्घाटन समारंभ संपन्न*(शहरातील ६५० हून अधिक संकलन केंद्रांवर प्लास्टिक व ई-कचरा संकलन होणार आहे.)

Image
*पेहेल-२०२६ अभियानाचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे उद्घाटन समारंभ संपन्न* (शहरातील ६५० हून अधिक संकलन केंद्रांवर प्लास्टिक व ई-कचरा संकलन होणार आहे.) (पुणे, १ मार्च २०२६) - पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आदर पूनावाला - क्लीन सिटी इनिशिएटीव्ह, एम.एन.जी.एल, के.पी.आय.टी आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्यामार्फत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पेहेल-२०२६ या पुणे शहरातील सर्वांत मोठ्या ई-कचरा व प्लास्टिक कचरा जनजागृती व संकलन अभियानाचा उद्घाटन समारंभ आज कर्वेनगर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर आणि जागरूक नागरिकांनी संकलन केंद्रावर ई-कचरा दिला.  यावेळी या उद्घाटनाला पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, कमिन्स इंडिया फाऊंडेशनचे सीएसआर मॅनेजर श्री. दिपक बेट्टी, तसेच प्लास्टिक वेस्ट प्रोजेक्ट लीडर श्री. अनिल कुलकर्णी, केपीआयटी डायरेक्टर श्री. स्वप्नील देशमुख, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे अनिलजी घळसासी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचीन कुलकर्णी, पूर्णम इकोव्हिज...

महाराष्ट्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत AMCCIE कडून ठाम व आक्रमक भूमिका*

Image
*महाराष्ट्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत AMCCIE कडून ठाम व आक्रमक भूमिका* पुणे : Agrawal Marwadi Chamber of Commerce, Industries & Education (AMCCIE) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत ठाम, परिणामकारक आणि वेळबद्ध सुधारणांची जोरदार मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक आणि औद्योगिक कणा असल्यामुळे केवळ घोषणांवर न थांबता ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. AMCCIE चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्राला टप्प्याटप्प्याने नव्हे तर वेगवान आर्थिक गतीची गरज आहे. उद्योग आणि गुंतवणूकदारांना ठोस निर्णयांची अपेक्षा आहे.” ठळक मागण्या पुढीलप्रमाणे : १) मुद्रांक शुल्क २% पर्यंत तात्काळ कमी करावे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गोयल यांनी ठाम मागणी केली की, राज्यभर मुद्रांक शुल्क एकसमान २% करण्यात यावे. सध्याचे उच्च दर रिअल इस्टेट व्यवहारांना अडथळा ठरत असून पारदर्शक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी व महसूल वाढीसाठी दरकपात आवश्यक आहे. २) जबाबदारीसह कडक सिंगल विंडो प्रणाली महासचिव उमेश मांडोत ...

संगीतही प्रतिकात्मक असते": टी.एम. कृष्णा यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा उलगडा करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

Image
संगीतही प्रतिकात्मक असते": टी.एम. कृष्णा यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा उलगडा करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन   पुणे, 28 फेब्रुवारी, 2026: "मी संगीत विश्वातून आलो आहे, जे स्वतःच प्रतीकात्मकतेने नटलेले आहे; आणि याच वारशातून मला मानवी प्रतीकांविषयी सखोल ओढ वाटू लागली," अशा शब्दांत ख्यातनाम गायक टी.एम. कृष्णा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे शुक्रवारी त्यांच्या 'वी द पीपल ऑफ इंडिया – डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल्स' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. हे पुस्तक म्हणजे भारताच्या अस्मितेचा कणा असलेल्या राष्ट्रीय प्रतीकांचा घेतलेला एक तात्त्विक आणि ऐतिहासिक शोध आहे. यामध्ये भारतीय तिरंगा, राष्ट्रगीत, 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य, राजमुद्रेवरील अशोकस्तंभ आणि भारतीय संविधानाची उद्देशिका यांच्या सांस्कृतिक व वैचारिक गाभ्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रगल्भ विश्लेषण टी.एम. कृष्णा यांनी केले आहे.   पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कला आणि संस्कृती विभागाच्या संयोजिका आरती किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'पलाश' (PALASH)...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश**कस्पटे मिसिंग लिंकची उच्च न्यायालयाकडूनही दखल**जमीन संपादित करुन काम जलदगतीने पूर्ण करुन न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे!**ना. पाटील यांच्या आयुक्तांना सूचना

*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *कस्पटे मिसिंग लिंकची उच्च न्यायालयाकडूनही दखल* *जमीन संपादित करुन काम जलदगतीने पूर्ण करुन न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे!* *ना. पाटील यांच्या आयुक्तांना सूचना* राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, उच्च न्यायालयानेही कस्पटे मिसिंग लिंकची गांभीर्याने दखल घेतली असून, सदर रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ना. पाटील यांनीही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करुन आयुक्तांना संपर्क साधत जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बालेवाडी-वाकडला जोडणारा पूल आणि त्याला जोडणारा कस्पटे वस्तीची मिसिंग लिंक पूर्ण होऊन नागरिकांची वाहतूककोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने सदर पूल आणि मिसिंग लिंकसाठी दोन आठवड्यांपूर्वी आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आढावा घेतला होता. तसेच, सदर काम अतिशय संथगतीने सुरु असल्य...